Dr. Bharti Pawar esakal
नाशिक

Dr. Bharti Pawar : विरोधकांकडून कांदाप्रश्‍नावर राजकारण : डॉ. भारती पवार

Dr. Bharti Pawar : नाफेडकडून कांद्याची नियमित तपासणी सुरू असते. माझ्याही कारकीर्दीत केंद्र सरकारमार्फत कांदाप्रश्‍नावर नेहमी तोडगा काढण्याचे प्रयत्न करण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

Dr. Bharti Pawar : नाफेडकडून कांद्याची नियमित तपासणी सुरू असते. माझ्याही कारकीर्दीत केंद्र सरकारमार्फत कांदाप्रश्‍नावर नेहमी तोडगा काढण्याचे प्रयत्न करण्यात आले. परंतु विरोधकांनी कांदाप्रश्‍नावर राजकारण करून शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याचा आरोप करताना दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे लोकसभेत चुकीच्या लोकांसोबत बसले असून, ते षडयंत्रात अडकलेले खासदार असल्याची टीका माजी मंत्री डॉ. भारती पवार यांनी केला. ( Dr Bharti Pawar statement of Politics on onion issue by opposition )

देशात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारतात आणीबाणी लागू करण्याच्या घटनेला २५ जूनला ४९ वर्ष पूर्ण झाले आहेत. त्या घटनेचा भाजपकडून देशभर निषेध केला जात असल्यानिमित्ताने पक्षाच्या वसंतस्मृती कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी त्या बोलत होत्या. डॉ. पवार म्हणाल्या, की १९७५ मध्ये देशात आणीबाणी लागू करून लोकशाहीची हत्या करणारे आज भारतीय घटनेची प्रत घेऊन राजरोसपणे फिरत आहेत.

लोकशाहीची हत्या करणारे घटनेची प्रत घेऊन लोकसभेत बसले आहेत. पंतप्रधान असताना इंदिरा गांधी यांनी देशावर लादलेल्या आणीबाणीवरही काँग्रेसने बोलावे, असे आवाहन केले. ग्रेसच्या सत्ताकाळात ७५ वेळा घटनेत बदल करण्यात आले. ९० वेळा देशातील वेगवेगळी राज्यसरकारे बरखास्त करून घटनेची हत्या केली. भाजप सत्तेत आल्यास घटनेत बदल करेल, असा खोटा प्रचार काँग्रेसने केला. (latest marathi news)

खोट्या प्रचारातून दलित, आदिवासींची फसवणूक केली. काँग्रेसने अनेकदा घटनेची पायमल्ली केली. काँग्रेसच्या काळातील काळा दिवस आम्ही विसरलो नाहीत, जोपर्यंत काँग्रेसचे नेते व पदाधिकारी आणीबाणीवर बोलत नाही तोपर्यत आम्ही जाब विचारत राहू, असेही डॉ. पवार यांनी या वेळी सांगितले. या वेळी प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, शहराध्यक्ष प्रशांत जाधव, गोविंद बोरस्ते, प्रवीण अलई, नाना शिलेदार आदी उपस्थित होते.

कांद्याची नियमित तपासणी

नाफेडकडून लासलगाव येथे कांद्याची तपासणी संदर्भात डॉ. पवार म्हणाल्या, की अशा प्रकारची नियमीत तपासणी सुरू असते. केंद्र सरकारकडून कांदाप्रश्नावरून नेहमीच तोडगा काढण्याचे प्रयत्न झाले. तक्रारीनंतर यापूर्वीही लगेचच कारवाई होत होती. परंतु विरोधकांनी कांदाप्रश्नावर राजकारण करून शेतकऱ्यांची दिशाभूल केली. भास्कर भगरे लोकसभेत चुकीच्या लोकांसोबत बसले असून, षडयंत्रात अडकलेले खासदार असल्याची टीका त्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोक शिव्या देतात, स्वागताला आलेल्या कार्यकर्त्यांना अजितदादांनी झापलं; VIDEO VIRAL

Maharashtra Latest News Update: मुंबई-गोवा महामार्ग अवजड वाहनासांठी बंद

Income Tax Return : कर सल्लागारांची तारेवरची कसरत; प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची तारीख वाढविल्याचा परिणाम

BCCI निवड समितीमधील 'या' सदस्याची उचलबांगडी करणार, अजित आगरकरचा करार...

UPSC Mains: युपीएससी मेन्समध्ये उत्तर लिहिताना 'या' 5 चुका करू नका, अन्यथा...

SCROLL FOR NEXT