post office  esakal
नाशिक

Nashik News : टपाल कार्यालयांची नावे स्थलांतरानंतरही कायम; नवीन नाव देण्यासाठी दिल्लीत मंत्रालयाची परवानगी गरजेची

Nashik : शंभर- दीडशे वर्षांपूर्वी संपर्कासाठी आजच्यासारख्या सुविधा नव्हत्या. ही गरज हेरत तत्कालीन इंग्रज राजवटीत देशात इतर सुधारणांबरोबरच टपाल खात्याच्या कारभारास सुरवात झाली.

दत्ता जाधव : सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शंभर- दीडशे वर्षांपूर्वी संपर्कासाठी आजच्यासारख्या सुविधा नव्हत्या. ही गरज हेरत तत्कालीन इंग्रज राजवटीत देशात इतर सुधारणांबरोबरच टपाल खात्याच्या कारभारास सुरवात झाली. नागरिकांच्या माहितीसाठी या खात्याच्या कोणत्याही शहरातील कार्यालयांना त्या त्या परिसराची नावे दिली गेली. कालौघात त्यातील अनेक टपाल कार्यालये स्थलांतरित होऊनही तीच नावे कायम राहिली आहेत. (Name of post offices remain even after migration )

मुख्य टपाल कार्यालयांच्या अंतर्गत टपाल व उपटपाल कार्यालये शहरात कार्यरत आहेत. प्रशासकीय कारणास्तव त्या कार्यालयांची ओळख म्हणून त्या कार्यालयांना ते कार्यरत असलेल्या परिसराची नावे देण्याची पद्धत इंग्रज काळापासून रूढ आहे. तीच पद्धत स्वातंत्र्यानंतरही सुरू राहिली. पंचवटी विभागासाठी दिंडोरी रोडवरील महालक्ष्मी थिएटरजवळ मुख्य टपाल कार्यालय अस्तित्वात होते.

कालांतराने हे कार्यालय गणेशवाडीतील महापालिकेच्या जागेत स्थलांतरित झाले, परंतु अद्यापही या कार्यालयाची तीच ओळख कायम आहे. पुरिया पार्कसमोर पुरिया पार्क टपाल कार्यालय अनेक वर्षे अस्तित्वात होते. पुढे हे कार्यालयही गणेशवाडीत व नंतर रविवार कारंजावर स्थलांतरित झाले, तरी त्याचे नाव तेच कायम राहिले. (latest marathi news)

बोहोरपट्टीतील सरकारवाडा पोलिस चौकीसमोर पोस्ट ऑफिस कार्यरत होते, शहराच्या मध्यवस्तीत असल्याने त्याचे नाव सिटी पोस्ट ऑफिस होते. आता हे टपाल कार्यालय स्थलांतरित होऊनही तेच नाव कायम आहे. रविवार पेठ टपाल कार्यालय पूर्वी या परिसरातील हिरालाल गल्लीत होते, पुढे त्याचेही स्थलांतर झाले.

मेनरोड टपाल कार्यालय पूर्वी तळमजल्यावर कार्यरत होते, आता ते त्याच ठिकाणी तिसऱ्या मजल्यावर स्थलांतरित झाले आहे. काळाराम मंदिर उत्तर दरवाजाजवळ पूर्वी काळाराम मंदिर टपाल कार्यालय होते, सध्या ते नारोशंकर शिव मंदिरासमोरील महापालिकेच्या इमारतीत स्थलांतरित झाले आहे, परंतु त्याची ओळख अद्यापही काळाराम मंदिर टपाल कार्यालय अशी राहिली आहे.

सेवा अबाधित ठेवण्याचा प्रयत्न : वाणी

जागा उपलब्ध झाल्या, त्यानुसार त्या विभागांत टपाल कार्यालयांची निर्मिती करण्यात आली. प्रशासकीयदृष्ट्या संबंधित कार्यालयांना ओळख म्हणून त्या परिसराची नावे देण्यात आली. कार्यालय स्थलांतरित झाल्यावर नवीन नाव देण्यासाठी दिल्लीत मंत्रालयाची परवानगी घ्यावी लागते, ही पद्धत क्लिष्ट व वेळखाऊ असल्याने तीच नावे कायम ठेवण्यात आली. मात्र नागरिकांना देण्यात येणारी सेवा अबाधित ठेवण्याचा खात्याचा प्रयत्न असल्याचे नाशिक विभागाचे वरिष्ठ टपाल अधीक्षक प्रफुल्ल वाणी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: हा व्हिडिओ खास आहे... नातं रक्ताचं नव्हतं, पण... जंगलात वाजली शहनाई, CRPF जवानांनी निभावलं वधूच्या भावाचं कर्तव्य

Ashadhi Wari 2025 : बंधुभेटीच्या सोहळ्याने अवघे वैष्णव भावुक; संत ज्ञानेश्वर महाराज-संत सोपानदेवांच्या भेटीचा सोहळा अनुभवण्यासाठी गर्दी

Satara Crime : धोमच्या चोरीप्रकरणी एकास अटक; नवनाथ दत्त मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कम लंपास

Public Health Corruption: आरोग्य खात्यात साहित्य खरेदीत गैरव्यवहार; आमदार डाॅ. राहुल पाटील यांचा विधानसभेमध्ये आरोप

Latest Maharashtra News Updates : अमित शहांचा आज पुणे दौरा, वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT