Deterioration of the river bed due to the release of water from the sewage treatment plant. esakal
नाशिक

Nashik News : तपोवनातील मलनिस्सारण केंद्राचे पाणी थेट नदीपात्रात!

Nashik News : तपोवन येथील मलनिस्सारण केंद्रातून (एसटीपी) मलजलयुक्त पाण्यावर संपूर्ण प्रक्रिया न करता पाणी गोदावरीच्या पात्रात सोडले आहे.

सकाळ वृत्तसेवा

पंचवटी : तपोवन येथील मलनिस्सारण केंद्रातून (एसटीपी) मलजलयुक्त पाण्यावर संपूर्ण प्रक्रिया न करता पाणी गोदावरीच्या पात्रात सोडले आहे. यामुळे गोदावरी नदीतील जीवजंतू व मासे यांना हानी पोचत आहे. येणाऱ्या पर्यटकांना या भागात दुर्गंधी सामोरे जावे लागते. यातूनच मनपाची गोदावरी नदीबद्दलची अनास्था दिसून येत आहे. तसेच उच्च न्यायालयाचादेखील अवमान होत असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमी करत आहेत. (Nashik Tapovan sewage center marathi news)

नाशिक महापालिकेने गोदावरी कृती आराखडाअंतर्गत कोट्यवधी रुपये खर्च करून ७८ एमएलडी प्लांट बांधला आहे. जेएनएनयूआरएम अंतर्गत ५२ एमएलडीच्या प्लांट तपोवन परिसरात बांधला आहे. असे असतानादेखील परिसरातून जमा झालेल्या मलजल पाण्यावर येथील संपूर्ण प्रक्रिया होत नसल्याने पाणी गोदावरीत सोडले जात आहे.

अशुद्ध पाणी सोडल्याने गोदावरी नदीपात्रात सर्वत्र फेस साचला आहे. हवेमुळे हा फेस उडून रहिवासी परिसरात जात आहे. यामुळे स्थानिक रहिवाशांना व येणाऱ्या पर्यटकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. या पाण्यामुळे नदीतील जैवविविधता नष्ट झाली आहे.

स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, या प्लांटपासून पुढे असलेल्या गावांना विषारी पाण्यामुळे धोका निर्माण झालेला आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार गोदावरी संवर्धन कक्ष उभारण्यात आला. गोदावरी नदी व परिसर स्वच्छ ठेवणे, अस्वच्छ करणाऱ्यावर कारवाई करणे आदी सूचना केल्या होत्या. (Latest Marathi News)

मात्र, पुढे तपोवनात असलेल्या मलनिस्सारण केंद्रातून गोदावरीत पूर्ण प्रक्रिया न करता पाणी सोडले जात आहे. या सर्व प्रकारामुळे मनपा अधिकारी कशा पद्धतीने नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करीत आहे हे उघड होत असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे

पाणी हानिकारक

महाराष्ट्र राज्य प्रदूषण महामंडळाच्या निर्देशानुसार मलनिस्सारण केंद्रातून प्रक्रिया झाल्यानंतर नदीपात्रात सोडण्यात येणारे पाणी १० ‘बीवोडी’ असणे आवश्यक आहे. परतू महापालिकेने ३० ‘बीवोडी’साठी डिझाइन केले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ नदीपात्रात सोडलेल्या पाण्याची तपासणी केली असता ३० बीवोडीच्या वरच आढळून आला आहे. यामुळे नदीपात्रात सोडलेले पाणी हे पात्रातील जीवजंतू व माशांच्या आरोग्यास हानिकारक आहे, असे पर्यावरणप्रेमीचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhanorkar Join BJP: रविंद्र चव्हाणांचा विराट शो! धानोरकरांचा भाजपात प्रवेश, काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंचा किल्ला कोसळला

मोदी सरकारचा मोठा निर्णय! Asia Cup 2025 स्पर्धेतील India vs Pakistan लढत होणार की नाही? फैसला झाला

तिला स्मशानात जळायचं नव्हतं... आईच्या गूढ मृत्यूबद्दल पहिल्यांदाच बोलली पूजा बेदी; म्हणाली, 'ती अचानक गायब झाली...

Stock Market Closing: शेअर बाजार वाढीसह बंद; सलग सहाव्या दिवशी तेजी, कोणते शेअर्स चमकले?

Bail Pola 2025: डिजेपासून बैलांना त्रास! शेतकऱ्यांना ‘ॲनिमल राहत’कडून १० सूचना

SCROLL FOR NEXT