Nilgavhan Goshala appeal farmers to not sell animal nashik news 
नाशिक

Nashik News: जनावरे विकू नका, आम्ही सांभाळतो! दुष्काळी परिस्थितीत निळगव्हाणच्या गोशाळेची साद

गोकूळ खैरनार

Nashik News : तालुक्यासह कसमादेत दुष्काळी परिस्थिती आहे. नोव्हेंबर महिन्यातच जनावरांचा चारा व पाण्याचा प्रश्‍न निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर शहरानजीकच्या निळगव्हाण येथील गोवंश रक्षा समितीची गोशाळा जनावरांसाठी तारणहार ठरत आहे.

चारा पाणी नसेल तर जनावरे आम्ही सांभाळतो, पण ते विकू नका या गोशाळेने केलेल्या आवाहनाला कसमादेतील शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला. (Nilgavhan Goshala appeal farmers to not sell animal nashik news)

गोशाळेकडे १३५ जनावरे संगोपनासाठी सुपूर्त करण्यात आली आहेत. यापुढेही दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांची गोवंश व इतर जनावरे सांभाळण्याची तयारी गोशाळेने दर्शविली आहे. गोमाता व इतर जनावरांचे दायित्व स्वीकारणाऱ्या गोशाळेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे

निळगव्हाण येथील गोशाळेत गायी, बैल, म्हैस, हेला, बकरी, मेंढी आदी ८२५ जनावरे आहेत. यात गायींचा समावेश अधिक आहे. संस्थेतर्फे त्यांचे संगोपन केले जाते. तालुक्यासह कसमादेत यावर्षी अल्प पावसामुळे दुष्काळी परिस्थिती आहे.

बळीराजा संकटात असताना गोशाळा त्यांच्या मदतीला धावून आली आहे. चारा व पाण्याच्या कारणामुळे कोणत्याही परिस्थितीत जनावरे विकू नका. जनावरांचा आम्ही विनामूल्य सांभाळ करतो. चारा पाण्याची व्यवस्था झाल्यानंतर जनावरे घेऊन जा असे आवाहन गो शाळेचे अध्यक्ष सुभाष मालू यांनी केले होते. या आवाहनाला लक्षणीय प्रतिसाद मिळाला.

मालेगाव तालुक्यासह कसमादेतील विविध गावांमध्ये १३५ जनावरे शेतकऱ्यांनी संगोपनासाठी गोशाळेकडे सुपूर्द केली आहेत. संबंधित काही शेतकऱ्यांकडे चारा व पाण्याची व्यवस्था झाल्याने त्यांनी त्यांची दुभती जनावरे पुन्हा नेली. गोशाळेत जनावरांना चारा-पाणी बरोबरच त्यांची वैद्यकीय तपासणी देखील केली जाते.

गरज पडल्यास औषधोपचार केले जातात. कसमादेत अनेक गावांमध्ये विहिरींनी तळ गाठला आहे. चाऱ्याचा प्रश्‍न आतापासूनच गंभीर होत आहे. हिरव्या चाऱ्याचे दर दुप्पटीने वाढले आहेत. अशा परिस्थितीत आगामी काळात विशेषत: उन्हाळ्यात जनावरे सांभाळणे जिकरीचे होणार आहे. अशा जनावरांचे दायित्व स्वीकारून त्यांचे संगोपन करण्याची तयारी गोशाळेने दर्शविली आहे.

"दुष्काळी परिस्थितीचा सामना करताना शेतकरी बांधवांनी कोणत्याही परिस्थितीत जनावरे विकू नयेत. ज्यांच्याकडे चारा पाण्याची व्यवस्था नसेल अशा शेतकऱ्यांच्या जनावरांचे आम्ही विनामूल्य संगोपन करू. चारा पाण्याची व्यवस्था झाल्यानंतर शेतकरी बांधव त्यांची जनावरे कधीही गो शाळेतून घेऊन जाऊ शकतात.

वृक्षतोड थांबविण्यासाठी नागरिकांनी अंत्यसंस्कारासाठी लाकडांऐवजी गोवरीचा वापर करावा. ही सेवा गोवंश रक्षा समितीतर्फे देण्यात येत आहे. गोवरी, कापूर, तूप यासाठी ९३७१२५५२८७, ९४२२२५५२८७ या क्रमांकावर संपर्क साधावा. यासाठी कुठलीही रक्कम घेतली जाणार नाही." - सुभाष मालू, अध्यक्ष, गोवंश रक्षा समिती, गोशाळा निळगव्हाण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT