नांदगाव (जि.नाशिक) : मनमाड पासून जवळच असलेल्या पानेवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज (ता.१५) शुक्रवारी मतदान होत असताना बॉयलेट पेपरमध्ये तीन उमेदवारांपैकी एका उमेदवाराचे नाव न आल्यामुळे एकच खळबळ उडाली. निवडणूक घोषीत झाल्यापासून नांदगाव यंत्रणेचा गलथानपणा अनुभवयास मिळत आहे. यावरून निवडणूक यंत्रणेचा सावळा गोंधळ सुरुच आहे. निवडणूक कर्मचाऱ्यांना पोस्टल मतदानापासून वंचित ठेवण्यात आल्यापासून मशिन बंद पडेपर्यंत हा गोंधळ थांबण्याचे नाव घेत नाही.
नाव न आल्यामुळे एकच खळबळ
ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने मनमाड पोलिस स्थानकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक पी.बी.गीते यांना ही माहिती कळविल्यानंतर ते तातडीने घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी येऊन याबाबतची पाहणी केली व याबाबतची माहिती नांदगावचे तहसीलदार यांना कळविल्यानंतर ते तातडीने पानेवाडी येथे दाखल झाले व त्यांनी नवीन पेपर लावून मशीन सुरू करून दिले. हा प्रकार येथील वार्ड क्रमांक दोन मध्ये घडला असून या वॉर्डात तीन उमेदवार निवडणुकीसाठी उभे होते. त्यापैकी एकाचे नाव आले नव्हते, मात्र यानंतर तब्बल पाऊण तासानंतर निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात करून दिली.
हेही वाचा > तरुणाकडून धक्कादायक वस्तू सापडताच पोलीसही हैराण! युवावर्गाला सहज मिळणाऱ्या गोष्टीचा लावणार शोध?
केंद्रावर तासभर प्रक्रिया खोळंबली.
सोनवणे यांनी प्रभाग तीन मधून मुदतीनंतर माघार घेतली. मात्र बॅलेट मशिनवर नांव कायम हवे असताना ते नसल्यामुळे तेथील केंद्रावर तासभर प्रक्रिया खोळंबली. शेवटी नाव चिकटविण्यात आल्याने प्रक्रिया सुरु झाली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.