Police case filed against BJP MLAs and activists Nashik news esakal
नाशिक

नाशिक : आमदारांसह दहा जणांवर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : कोरोना (Corona) नियमांसह पोलिस आयुक्तांनी केलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्यासह दहा जणांवर भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांना फोन टॅपिंगप्रकरणी बीकेसीतील सायबर पोलिस ठाण्यात जबाब नोंदविण्यासाठी नोटीस पाठविण्यात आली. श्री. फडणवीस यांना दिलेली नोटीस आणि चौकशीचा राज्यभर भाजपकडून निषेध केला जात आहे.


नाशिक शहरातही भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून निषेध व्यक्त केला. नोटीस प्रतीची होळी करण्यात आली. या वेळी ‘ठाकरे सरकार हाय हाय, उद्धव ठाकरे हाय हाय’, ‘फडणवीस साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, अशा घोषणा देण्यात आल्या. भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते. आंदोलनादरम्यान कोरोना नियमांचे उल्लंघन करत गर्दी जमवली. केवळ आंदोलनाची परवानगी असतानाही मोठ्या प्रमाणावर गर्दी जमवत जाळपोळ केल्याप्रकरणी आमदार प्रा. देवयानी फरांदे, सुजिता करंजीकर, संगीता जाधव, वैशाली जाधव, सोनल दगडे, बबलू परदेशी, अशोक गोसावी, वसंत उशीर, गणेश कांबळे, अरुण शेंदुर्णीकर, पवन उगले यांच्यावर पोलिस कर्मचारी सतीश धनगर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT