police recruitment esakal
नाशिक

Police Recruitment : पोलिस भरती अर्ज दाखल; प्रत्यक्ष प्रक्रियेची मात्र उमेदवारांना प्रतीक्षा!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : राज्यभर पोलिस भरतीची प्रक्रिया सुरू आहे. महाराष्ट्र पोलिसदलात १४ हजारांपेक्षा अधिक पदे भरली जात असून, नाशिक ग्रामीणमध्ये १६४ पोलिस शिपाई व १५ चालकांची पदे भरण्यात येणार आहेत. अर्जानंतर आता उमेदवारांना प्रत्यक्ष प्रक्रियेची प्रतीक्षा आहे. (Police recruitment application filed candidates waiting for actual process nashik news)

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

पोलिस भरतीसाठी अर्ज नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. अर्ज छाननी करण्याचे कामकाज सुरू आहे. तर उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी तयार राहण्याच्या सूचना ग्रामीण अधीक्षक कार्यालयाने दिल्या आहेत. २ जानेवारीपासून मैदानी चाचणी सुरू होणार असून, लवकरच वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे.

परंतु, नाशिक ग्रामीण भरतीमधील २९० पदे गायब झाल्याचा घोळ भरतीप्रक्रिया सुरू झाल्यावर उघड झाला होता. मात्र, महासंचालक कार्यालयाने अंतिम रिक्त पदांची यादी जाहीर केल्यानुसार १६४ शिपाई व १५ चालकांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले. त्यानुसार २०१९ नंतर आता पोलिस भरती होत असून, तीन वर्षांनंतरच्या भरतीप्रक्रियेत हजारो अर्ज प्राप्त झाले आहेत.

त्यासंदर्भातील आकडेवारी अद्याप ग्रामीण अधीक्षक कार्यालयाने स्पष्ट केली नसली तरी वेळापत्रकातून त्यासंदर्भातील माहिती स्पष्ट होणार आहे. कोरोनामुळे रोजगार घटल्याने बारावी उत्तीर्णसहित उच्चशिक्षितांचे पोलिस भरतीकडे लक्ष आहे. त्यामुळे २ जानेवारीपासून नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयातर्फे मैदानी चाचणीची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT