Rainwater Harvesting Movement Building Meetings esakal
नाशिक

Rainwater Harvesting : नाशिक शहरात आता रेन वॉटर हार्वेस्टिंग चळवळ! भूजल पातळी वाढविण्यासाठी निर्णय

सकाळ वृत्तसेवा

Rainwater Harvesting : थंड हवेचे ठिकाणी म्हणून नाशिकचा लौकिक असला तरी वाढत्या शहरीकरणामुळे तापमानात वाढ होत आहे. तापमान वाढीला भूगर्भातील कमी होत असलेला पाणीसाठा कारणीभूत असून, जलपातळी वाढविण्यासाठी नाशिककरांना रेन वॉटर हार्वेस्टिंगची चळवळ हाती घेणे गरजेचे असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. भूजल पातळी वाढविण्यासाठी जलचर मॅपिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला. (Rainwater harvesting movement in Nashik city now Decision to increase groundwater level nashik news)

रेन वॉटर हार्वेस्टिंग, जनचळवळ चालू करण्यासंदर्भात महापालिका मुख्यालयात गुरुवारी (ता. ४) बैठक झाली. महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, नमामि गोदा फाउंडेशनचे राजेश पंडित, अभिनेता व महापालिकेचे ब्रॅण्ड ॲम्बेसिडर चिन्मय उदगीरकर, किरण भालेराव, अपर्णा कोठावळे,

राहुल रायकर, निशिकांत पगारे, क्रेडाई मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील, सचिव गौरव ठक्कर, निरंजन शहा, सतीश मोरे, सागर शहा, नरेंद्र कुलकर्णी, पर्यावरण विभागाचे उपायुक्त विजयकुमार मुंडे, नगररचना विभागाचे उपसंचालक हर्षल बाविस्कर आदी उपस्थित होते.

शहराचा विस्तार होत असताना मोठ्या प्रमाणात बांधकामे होत आहे. नवीन बांधकामांसाठी कूपनलिका खोदल्या जात आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी भूजल उपसले जात असल्याने पातळी घटत आहे. सिमेंट काँक्रिटचे क्षेत्र वाढत असल्याने पाणी जमिनीत मुरत आहे.

पावसाचे पाणी पावसाळी गटार योजनेतून सरळ नदीत जात असल्याने ते पाणीदेखील जमिनीत झिरपत नाही. त्यामुळे सातत्याने भूजल पातळी खालावत असून त्याचा परिणाम भूजल पातळी खालावण्यावर होत आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

परिणामी शहराच्या तापमानात वाढ होत असल्याने आताच उपाययोजना न केल्यास थंड हवेचे शहर म्हणून असलेला नावलौकीक लयास जाण्याची भीती आहे. त्यामुळे रेन वॉटर हार्वेस्टिंग चळवळ हाती घेण्याचे आवाहन श्री. पंडित व अभिनेते चिन्मय उदगीरकर यांनी केले.

महापालिका आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंगला प्रोत्साहन देण्यासाठी योजना आखल्याची माहिती दिली. पर्यावरणपूरक मित्र इमारत, पर्यावरणपूरक मित्र सोसायटी (गृहनिर्माण संस्था) असे पुरस्कार महापालिकेकडून दिले जाणार आहे.

महत्त्वाचे निर्णय

- तापमान वाढू नये यासाठी उपाययोजना.
- बोअरवेल ठिकाणी पाण्याचे पुनर्भरण करणे.
- शोष खड्डे तयार करावे.
- जलचर मॅपिंग करणे.
- पाणी अडवा, पाणी जिरवा मोहीम राबविणे.
- भूगर्भातील पाण्याचे नियोजन, वृक्षारोपण मोहीम.
- लोकांचा सहभाग वाढविणे.
- महापालिकेच्या मोकळ्या भूखंडावर झाडे लावणे.
- जॉगिंग ट्रॅकवर रेन वॉटर हार्वेस्टींग करणे.
- पावसाळी गटार योजनेचे पाणी थेट नदीत जाऊ न देणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदी सरकारचा मोठा निर्णय! Asia Cup 2025 स्पर्धेतील India vs Pakistan लढत होणार की नाही? फैसला झाला

Maruti Cars: जीएसटी कमी झाल्यानंतर अल्टो, स्विफ्ट, डिझायर आणि वॅगनआरची किंमत किती असेल?

Prithvi Shaw : IPL 2026 मध्ये पृथ्वी शॉ CSK च्या ताफ्यात? ऋतुराज गायकवाडची मध्यस्थी? फ्रँचायझीने पोस्ट केला Video

न्यायालये ताकदवान नाहीत, हात बांधलेत असं आम्ही म्हणू का? सरन्यायाधीशांचा सरकारला सवाल

Diabetes in Kids: तुमच्या मुलांना डायबिटीजचा धोका आहे का? 'ही' ८ लक्षणे वेळेत ओळखून घ्या योग्य काळजी

SCROLL FOR NEXT