politics
politics google
नाशिक

पवार कंपनीपासून राज्याला वाचवण्याची हीच वेळ - खोत

सकाळ डिजिटल टीम

'कोरोना काळ संपला असला तरी सरकारचा मात्र अद्याप कोरोना संपत नाही हे दुर्देव'

राज्याचे पवार आणि पवार कंपनीने वाटोळे केले आहे. या राज्यास आता पवारांपासून वाचवण्याची वेळ येऊन ठेपली असून राज्यातील सरकार सध्या बारामती (baramati) वरून चालतं असल्याची खरमरीत टीका आज नेते सदाभाऊ खोत यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार (sharad pawar) यांच्यावर केली आहे. सदाभाऊ खोत (sadabhau khot) यांचे जागर शेतकऱ्यांचा आक्रोश महाराष्ट्राचा (Jagar Shetkaryancha Aakrosh Maharashtracha) हे राज्यव्यापी अभियान सुरु आहे. ते आज नाशिक (nashik) येथे आले असता त्यांनी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. (sadabhau khot latest marathi news)

यावेळी खोत यांनी शेतकऱ्यांना आंदोलन केले. ते म्हणाले, जागर शेतकऱ्याचा आणि आक्रोश महाराष्ट्राचा अभियान आम्ही सुरू केले आहे. त्यातून शेतकऱ्यांचा राज्य सरकारवरील रोष आणखी कळत आहे. कोरोना काळ संपला असला तरी सरकारचा मात्र अद्याप कोरोना (corona) संपत नाही हे दुर्देव आहे. सरकारी तिजोरीवर सरकार दिवसाढवळ्या दरोडा टाकत आहे. हा दराडो लपवण्यासाठी सरकार रोज वेगवेगळे विषय काढत आहे.

पुढे शिवसेनेवर टीका करत ते म्हणाले, शिवसेनेची (shivsena) सत्ता आल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याचे दहा हजार भरणार हे आश्वासन देण्यात आले होते. दहा हजार सोडा शेतकऱ्यांची वीज सरकार कापू लागले आहे. दूसरीकडे आमची सत्ता आल्यानंतर आम्ही वीज मोफत देऊ असे अजित पवार (ajit pawar) यांनी सांगितले होते. त्याचे काय झाले असा प्रश्न खोत यांनी उपस्थित केला आहे. पीक विमा, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना (farmers) ५० हजार रुपये अद्याप दिलेले नाहीत ही शोकांतिका म्हणावी लागेल, असंही ते म्हणाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT