Sunil More esakal
नाशिक

सटाण्याच्या माजी नगराध्यक्षांवर सनसनाटी आरोप

अंबादास देवरे

सटाणा (जि. नाशिक) : ऐन मार्च- एप्रिल महिन्यात शहराला तीन दिवसांआड तेही कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू केल्याने शहरात भिषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. याला सर्वस्वी जबाबदार माजी नगराध्यक्ष सुनील मोरे हेच असून, पुनंद धरण पाणी योजनेच्या अपयशाचे खापर पालिका प्रशासनावर फोडून मोरे शहरवासीयांची दिशाभूल करीत आहेत, असा सनसनाटी आरोप माजी नगराध्यक्ष विजयराज वाघ व पांडुरंग सोनवणे यांनी निवेदनाद्वारे केला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, प्रशासनाने बुधवार (ता. ६) पासून शहरात तब्बल तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे वेळापत्रक जाहीर केले. माजी नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी गेल्यावर्षी शहरात पुनंद पाणीपुरवठा योजनेचे पाणी आल्याचे भासवून केलेला जलपूजनाचा सोहळा म्हणजे पालिकेच्या आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन शहरवासीयांच्या डोळ्यात निव्वळ धूळफेक करण्याचा प्रकार होता का, सध्या शहराला पाणीपुरवठा करणारे ठेंगोडा येथील गिरणा नदीपात्र आणि आरम नदीपात्र कोरडेठाक झाल्याने शहरवासीयांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाणीटंचाईमुळे (water scarity) पालिका प्रशासनाने बुधवार (ता. ६) पासून शहरात तब्बल तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. मात्र, यामुळे पुनंद योजनेचे स्वप्न दाखविणाऱ्या माजी नगराध्यक्ष सुनील मोरे यांचे पितळ उघडे पडल्याची टीका त्यांनी केली.

गेल्या तीन वर्षांपासून योजनेच्या जलवाहिन्यांचे काम अद्यापही सुरूच आहे. माजी नगराध्यक्ष मोरे यांनी अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपण्याआधीच गेल्यावर्षी घीसडघाईने खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते योजनेचे जलपूजन केले. जणूकाही खरच उद्यापासून नळांना पुनंदचे पाणीच आल्याचा देखावा केला गेला होता. गेल्या वर्षी १ मे २०२१ महाराष्ट्र दिनापासून शहरवासीयांना २४ तास पुनंद योजनेचे पाणीही देण्याचेही माजी नगराध्यक्षांनी जाहीर केले होते. मग, जनतेची ही निव्वळ फसवणूक आहे. पुनंद योजनेचे काम आजही अपूर्ण असताना मोरेंनी गेल्यावर्षी १ मेला पाणी देण्याचे आश्‍वासन कोणत्या आधारावर दिले, असा सवालही श्री. वाघ व श्री. सोनवणे यांनी उपस्थित केला आहे. निवेदनावर राष्ट्रवादीचे शहाराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, मनोज सोनवणे, नितीन सोनवणे, सुरेखा बच्छाव, शमा मन्सुरी, मुन्ना शेख, रत्नाकर सोनवणे, आदींसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.

"शहरातील संभाव्य पाणीटंचाई व उपाययोजनेबाबत पालिका प्रशासन व नवनियुक्त प्रशासकांना दहा दिवसांपूर्वीच मी पत्र देऊन पुनंद धरणातून पाणी उचलावे असे सूचित केले होते. मात्र, प्रशासनाने टंचाईविषयी कुठलीही पूर्वबैठक व नियोजन न केल्यामुळे आज टंचाईस सामोरे जाण्याची वेळ आली आहे. विरोधकांनी पराचा कावळा करू नये."

- सुनील मोरे, माजी नगराध्यक्ष, सटाणा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance : आरोग्य विम्यावर ‘जीएसटी’चा भार; सर्वसामान्यांचे बिघडतेय आर्थिक गणित

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रावर अतिमुसळधार पावसाचे संकट, पुढील 24 तास महत्वाचे; हवामान विभागाचा हाय अलर्ट

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : महाराष्ट्रापुढील सर्व संकटे दूर करण्याची शक्ती पांडुरंगाने द्यावी- देवेंद्र फडणवीस

Beed News: परळीतील गोळीबार खून प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय ,आरोपींना मिळणार नाही जामीन!

Ashadhi Ekadashi 2025 Special Recipe: आषाढी एकादशीनिमित्त उपवासाला बनवा खास अन् स्वादिष्ट पॅटिस, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT