water scarcity esakal
नाशिक

नाशिक : रातीरला भीषण पाणीटंचाई; रणरागिनींनी काढला हंडा मोर्चा

उन्हाच्या तीव्र झळा वाढू लागताच गावांना तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याचे चित्र

दीपक खैरनार

अंबासन (जि.नाशिक) : उन्हाच्या तीव्र झळा वाढू लागताच कुपनलिका, विहिरीतील पाणी खोलखोल जाऊ लागले आहे. त्यामुळे तालुक्यातील काही गावांना तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याचे चित्र निर्माण झाले असून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी दाही दिशा भटकावे लागत असल्याने रातीर (ता.बागलाण) येथील महिलांनी हंडा मोर्चा काढत ग्रामपंचायत सदस्यांना कार्यालयात कोंबले यामुळे सदस्यांची नामुश्की ओढावली होती. प्रशासनाने पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.

रातीर (ता.बागलाण) येथील ग्रामपंचायत कार्यालयात नेहमीप्रमाणेच सदस्यांचे कामकाज सुरू असतानांच गावातील महीलांनी पिण्याच्या पाण्यासाठी हंडा मोर्चा काढत एकच कल्लोळ केला. संतप्त रागरगिंनींनी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकून ग्रामपंचायत सदस्यांना जाब विचारत कोंबण्यात आले होते. ग्रामपंचायत प्रशासनाकडून पिण्याच्या पाण्यासाठी याआधीच प्रशासनाच्या टँकरसाठी वरिष्ठांकडे प्रस्ताव सादर केल्याचे सांगण्यात आले. या परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून पाणीटंचाई (water scarcity) पाचवीलाच पुजलेली असूनदेखील प्रशासनाकडून ठोस असा निर्णय होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

विहीरी, कूपनलिका तसेच गावातील हातपंपांनी आदीच माना टाकल्याने ग्रामपंचायत प्रशासनाकडून स्वखर्चाने गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची तहान भागविण्यात आली होती. मात्र दोन दिवसांपासून वीजेचा लपंडाव यामुळे टँकर येऊ शकले नाही त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात भेडसावत होती. परिसरात रातीर, रामतीर, सुराणे, वायगाव, सातमानेपर्यंत पाणीटंचाईची दाहकता दिसून येत आहे. सुराणे गावानजीक चिरखांड धरण असूनही गेल्या पंचवीस वर्षांपासून कोरडे ठाक पडले आहे. प्रशासनाकडून गंभीर दखल घेत गावाला टॅकर सुरू करावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

कालव्याच्या प्रतिक्षेत

गेल्या पन्नास वर्षांपासून या परिसरातील नागरिक प्रलंबित असलेला हरणबारी उजवा कालव्याच्या प्रतिक्षेत आहेत. दरम्यान संघर्ष समितीसह नागरिकांकडून कालव्याच्या कामासाठी अटोकाट प्रयत्न सुरूच असून कालव्याचे काम झाल्यास लाभक्षेत्रातील सर्व गावांना फायदेशीर ठरणार आहे व कायमस्वरुपी पाण्याचा प्रश्न निकाली लागणार आहे. प्रशासनाने दखल घेऊन प्रतिक्षेत असलेला कालव्याकडे लक्ष घालावे असे नागरिकांकडून सांगितले जाते.

मागील २०२१ मधील पाणीटंचाईग्रस्त गावे

रातीर, वघाणेपाडा, नवेगाव, चिराई, राहुड, महड, बहिराणे, कातरवेल, या गावात प्रशासनाकडून सहा टॅकरव्दारे पाणीपुरवठा सुरू होता.

यावर्षी २०२२ टॅकरसाठी प्रस्ताव

रातीर, रामतीर मंजूरीसाठी प्रांत कार्यालयाकडे सादर तर सुराणे तहसील कार्यालयास सादर

नवेगाव, कातरवेल प्राप्त तसेच सारदे, दोधानपाडा टॅकरसाठी संभाव्य आहे.

आम्ही गावातील पाणीटंचाई लक्षात घेऊन तात्काळ पिण्याच्या पाण्यासाठी वरिष्ठांकडे टँकरसाठी प्रस्ताव सादर केला आहे. लवकरच गावाला प्रशासनाकडून टॅकर सुरू करण्यात येईल.

-समाधान आहिरे, ग्रामपंचायत सदस्य, रातीर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai port oil tanker arrival: होर्मुझचा धोकादायक मार्ग पार करत पहिले तेलवाहू जहाज मुंबई बंदरात दाखल! व्हिडिओ पाहा...

Maharashtra Heatwave : विदर्भात उष्णतेची लाट ! अमरावतीत देशातील सर्वाधिक तापमान, मात्र राज्यातील 'या' जिल्ह्यांत अवकाळीचा इशारा

Solapur Water Crisis: सोलापूर शहरात आता चार अन् पाच दिवसांआड पाणी; तीन दिवसांआडची पद्धत बंद, जलवाहिनी नसलेल्या ठिकाणी टँकरने पुरवठा!

Nanded News: नांदेडमध्ये गॅस एजन्सीसमोर पहाटेपासून रांगा; घरगुती सिलिंडरवर व्यावसायिकांची नजर; घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर वाढला

Latest Marathi News Live Update : आंतरराष्ट्रीय शांतता दिनानिमित्त पुण्यात आज मुस्लिम समाज काढणार शांतता मोर्चा

SCROLL FOR NEXT