Dried soybeans in the field due to lack of water esakal
नाशिक

Nashik News: सिन्नर तालुक्याची पैसेवारी 50 पैशांच्या आत! पावसाअभावी खरिपाबरोबर रब्बी हंगामही धोक्यात

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : तालुक्यात खरिपाबरोबर रब्बी हंगामही धोक्यात आला आहे. पावसाअभावी जमिनीत फारशी ओल नाही. विहिरींतील पाणीपातळी कमी झाली आहे. परिणामी, रब्बी हंगामावर मोठा परिणाम झाला आहे.

सिन्नर तालुक्यांतील १२८ गावांची नजर पैसेवारी ५० पैशांच्या आत आहे. या परिस्थितीमुळे शेतकरी द्विधामनःस्थितीत सापडला आहे. एकंदर तालुक्यावर दुष्काळाचे सावट आहे. (Sinnar taluka pay within 50 paise Rabi season also in danger along with Kharif due to lack of rain Nashik News)

सिन्नरच्या महसूल विभागाने सप्टेंबरअखेरची सिन्नर तालुक्याची नजर पैसेवारी ५० पैशांच्या आत असल्याचे सांगितले. पीक कापणीनंतर सुधारित पैसेवारी ३१ ऑक्टोबरअखेर जाहीर होईल.

दुष्काळी तीव्रता योजनांचा लाभ घेण्यासाठी यंदा डिसेंबरमध्ये अंतिम पैसेवारी जाहीर होण्याची शेतकऱ्यांना वाट पाहावी लागणार आहे. सिन्नर तालुक्यात केवळ १२८ गावे आहेत.

त्यात ११० गावे तालुक्यात खरिपाची, तर १८ गावे रब्बीची आहेत. मात्र, तालुक्यात सप्टेंबरअखेर व १२८ गावांची नजर पैसेवारी ५० पैशांच्या आत जाहीर झाली आहे. सिन्नर तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ५५६ मिलिमीटर असते.

या वर्षी केवळ ३६८ मिलिमीटर म्हणजेच सरासरीच्या केवळ ६६ टक्के पाऊस पडला आहे. अल्प पावसामुळे अनेक गावांमध्ये पेरण्या झाल्या नाहीत. अनेक गावांमध्ये नांगरटीही झाली नाही.

ऐन फुलोऱ्यात आलेल्या सोयाबीन, मका पिकाला वेळेवर पाणी मिळाले नाही. त्याचा सोयाबीन, मका पिकाला मोठा फटका बसला.

उरल्यासुरल्या सोयाबीनची सोंगणी शेतकऱ्यांनी शेतात केली. त्यातही ३० टक्केच उत्पन्न मिळाले असल्याचे शेतकरी सांगतात. खर्चही न निघाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

तालुक्याच्या पूर्व भागातील फुलेनगर व दुशिगपूर बंधाऱ्यात पाण्याची आवक झाली नाही. या परिसरात दरवर्षी दुष्काळ असतो. भोजापूर, कोनांबे, उंबरदरी, सरदवाडी, बोरखिंड धरणे भरल्याने त्यावरील पाणीयोजना सुरळीत चालतील.

मात्र, पूर्व भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट राहील. ऑक्टोबरमध्येच दुभत्या जनावरांसाठी चाऱ्याची चणचण अनेकांना भासत आहे.

अनेक गावांना पाणीटंचाईच्या झळा

निऱ्हाळे गावासह २३ वाड्यांना ६ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यात पांगरीच्या ६ वाड्या, खंबाळेच्या ४, शिदेवाडीच्या २, पंचाळेच्या ८, दोडी खुर्दच्या रामोशीवाडी, निऱ्हाळेच्या तीन वाड्यांचा समावेश आहे.

पशुधन वाचविण्याची शेतकऱ्यांना चिंता

खरिपाची पिके पावसाअभावी वाया गेली आहेत. आता रब्बीची पेरणी तोंडावर आली आहे. मात्र, पावसाचे कोणतेही आशादायी चित्र दिसत नाही.

यामुळे वैरणीशिवाय तालुक्यातील पशुधन कसे वाचवावे, याची चिंता बळीराजाला लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दिवाळी सणावर दुष्काळाचे सावट आहे.

"यंदा रब्बीच्या पेरण्या कराव्यात की नाही, असा प्रश्न बळीराजा समोर आहे. खरीप वाया गेला असून, रब्बीचे पिकेही वाया जाण्याची भीती आहे. पूर्व भागात अनेक गावात पाण्याचे टँकर सुरू असून, चाऱ्यासाठी आतापासूनच दरमजल फिरावे लागत आहे. यंदा सर्व गणिते बिघडली आहेत. शासनाने सिन्नर तालुका दुष्काळ जाहीर करावा व सर्व मदत शेतकऱ्यांना करावी."

-डॉ. रवींद्र पवार, सभापती, बाजार समिती, सिन्नर

"शेतकऱ्याला उत्पादन खर्च काढून चार पैसे मिळाले नाही, तर त्याच्यावर कर्ज वाढते. नवीन पिकांसाठी त्याच्याकडे भांडवल उरत नाही. पुन्हा लम्पी रोगाने डोके वर काढले आहे. शासनाने पशुधन विमा योजना राबवली पाहिजे. खरीप वाया गेला असून, रब्बी पिकांसाठी शेतात ओल नाही." -योगेश शिंदे, शेतकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT