Jal Jeevan Mission News esakal
नाशिक

Jal Jeevan Mission : ‘जलजीवन’च्या 21 कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा थांबवण्याचा राज्य सरकारचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा

Jal Jeevan Mission : केंद्र सरकारच्या ‘हर घर जल’ उपक्रमात महत्त्वाची भूमिका निभावलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा कार्यकाळ ३१ जुलैला पूर्ण होत असल्याने त्यांची सेवा थांबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

दहा महिन्यांपासून त्यांचे वेतनही थकले आहे. (state government decision to terminate services of 21 contract employees of Jal Jeevan mission nashik news)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून दोन वर्षांपूर्वी जलजीवन मिशन योजनेची घोषणा करण्यात आली. त्याअंतर्गत जिल्हा परिषदेने आउटसोर्सिंगद्वारे कंत्राटी अभियंत्यांची नियुक्ती केली. ग्रामीण भागातील जनतेला थेट घरात नळाद्वारे शुद्ध पाणीपुरवठा करण्याच्या या योजनेची अंमलबजावणी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागावर सोपवली होती.

या विभागाकडे मनुष्यबळाचा तुटवडा असल्याने खासगी कंपनीच्या माध्यमातून कंत्राटी पद्धतीने कनिष्ठ अभियंत्यांची मानधनावर नियुक्ती केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यांच्याकडून वर्षभरात विविध ठिकाणी कामे करून घेण्यात आली. गेल्या ऑक्टोबरपासून या कर्मचाऱ्यांना मानधनही मिळालेले नाही.

कधीतरी मानधन मिळेल, या आशेवर हे कर्मचारी दहा महिन्यांपासून कार्यरत आहेत. त्यांचा कार्यकाळ ३१ जुलैला पूर्ण होत आहे. त्यांना कार्यमुक्त करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच केंद्र सरकारकडून पैसे प्राप्त झाल्यानंतर त्यांचे थकीत वेतन दिले जाणार आहे. त्यापोटी ७० लाख रुपयांची मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, NZ vs ENG : इंग्लंडने बाजी मारली, पाकिस्तानच्या जीवात जीव आला! न्यूझीलंड पराभूत होऊनही पोहचू शकतात उपांत्य फेरीत

Reliance Group: अंबानींच्या सून राधिका मर्चंट पैठणमध्ये! तीन महिन्यात दुसरा दौरा; पोलिस बंदोबस्तात प्रकल्पाला दिली भेट

Accident : सिंदखेड फाट्यावर दुचाकी चारचाकीची भीषण धडक; एक महिला ठार, एक जखमी

Mount Abu Name Change : जगप्रसिद्ध 'माउंट अबू'सह तीन शहरांचे नामांतर; मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची मोठी घोषणा

Rinku Singh : देशासाठी रिंकू सिंग परतणार! वडिलांच्या अंतिम संस्कारानंतर तो कोलकात्यात संघात दाखल होणार, वेस्ट इंडिजला भिडणार...

SCROLL FOR NEXT