Struggle for water
Struggle for water esakal
नाशिक

Nashik : ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट

कुणाल संत

नाशिक : निसर्गाची भरभरून देणगी लाभलेल्या घोटीकरांना उन्हाळात पिण्याच्या पाण्यासाठी करावी लागणारी पायपीट ऐन पावसाळ्यात करण्याची वेळ आलेली आहे. आजूबाजूला डोंगर, दऱ्या आणि पाण्याचे भरपूर स्त्रोत असतानादेखील घोटीमधील लोकांना केवळ आठवड्यातून एकदाच पिण्याचे पाणी उपलब्ध होत आहे. त्यामुळे ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’ या वाक्प्रचाराचा खरा अनुभव येथील नागरिकांना मिळत आहे. (struggle for drinking water during rainy season in ghoti Nashik latest marathi news)

घोटी बुद्रुक हे मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील सर्वांत मोठे आणि मुख्य बाजारपेठेचे शहर आहे. दारणा नदीलगतच हे शहर वसलेले आहे. अकोले, शहापूर, सिन्नर तालुक्याच्या सीमेवरील लोकांसाठी घोटी हीच मुख्य बाजारपेठ आहे.

महामार्गावरच शहर वसल्याने घोटी शहराचा विकास देखील झपाट्याने होत आहे. सद्यःस्थितीत सुमारे ३५ हजारांच्या आसपास येथील लोकसंख्या आहे. घोटी शहरातील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी दारणा नदीवर सुवेड बंधाऱ्याची निर्मिती केली असून, नदीतून पाणी या बंधाऱ्यात घेऊन ते फिल्टर करून घोटीकरांना नळाच्या सहाय्याने हे पाणी उपलब्ध करून दिले जाते. त्यासाठी घोटी ग्रामपालिकेतर्फे पाणीपुरवठा योजना राबवून तशी व्यवस्थादेखील करण्यात आली आहे.

घोटी शहराला निसर्गाची भरभरून देणगी लाभली असल्याने सदरचा भाग हा पाण्याने समृद्ध झालेला आहे. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात याठिकाणी पाऊस पडतो. त्यामुळे घोटीला भाताचे मोठे आगार लाभले आहे.

सर्वच बाजूने समृद्ध असलेल्या घोटीकरांवर मात्र पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे. शहरालगत असलेल्या वाड्यावरील महिलांना तर उन्हाळ्याप्रमाणेच ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी डोक्यावर हंडे घेऊन मैलभराची पायपीट करण्याची वेळ आलेली आहे.

नळ असूनही महिला विहिरींवर
घोटी शहरातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी घरोघरी नळाद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र पावसाळ्यात नळाद्वारे अशुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असल्याने महिलांना शुद्ध पाण्यासाठी थेट विहिरींवर जाण्याची वेळ येत आहे.

"पिण्याच्या पाण्यासाठी घरापर्यंत नळ आलेले आहे. मात्र या नळाला आठवड्यातून एकदाच पाणी येते. त्यातही हे पाणी काही वेळ असल्याने अतिरिक्त पाण्यासाठी नियमित पायपीट करावीच लागत आहे." -विमल धुमाळ

"शहराला सुमारे पाच ते सहा दिवसांमधून एकदा पाणीपुरवठा होत आहे. त्यातच नळाद्वारे गढूळ पाणी येत असल्याने ते पिण्यास योग्य वाटत नाही. मागील आठ ते दहा दिवस झाले नळाला पाणी आलेले नाही. याबाबत जाब विचारला असता, वीज नाही, मोटार खराब अशी कारणे दिली जात आहेत. त्यामुळे उन्हाळ्याप्रमाणे ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. " -शैला मते

"पावसाळ्यात वापरण्यासाठी मुबलक पाणी असते. मात्र पावसाळ्यात पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे म्हणून विहिरीवर येऊन पाणी भरण्याची वेळ आली आहे. उन्हाळ्यात अशीच परिस्थिती असते. परंतु पावसाळ्यात देखील हीच परिस्थिती. आता नळाला येणारे पाणीदेखील पिताना कडू लागत असल्याने शुद्ध पाण्यासाठी पायपीट ठरलीच आहे. " -संगीता वारघडे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi: हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह परराष्ट्र मंत्र्याचा मृत्यू- रिपोर्ट

Shivam Dube : शिवम दुबेला लागले ग्रहण... T20 World Cupसाठी संघात निवड झाल्यानंतर 5 सामन्यात केल्या फक्त इतक्या धावा

Masala Omelette Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा मसाला ऑम्लेट, चवदारही लागणार अन् पोटही भरणार.!

Stock Market: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजार कसा असेल? पंतप्रधान मोदींनी वर्तवले भाकित

Maharashtra Lok Sabha Phase 5 Election : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान! राजनाथ सिंह, राहुल गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

SCROLL FOR NEXT