Sugar production  esakal
नाशिक

राज्यात जम्बो उत्पादनामुळे साखर निर्मितीत 20 टक्के वाढ

गोकुळ खैरनार : सकाळ वृत्तसेवा

मालेगाव (नाशिक) : सलग दोन वर्षे झालेल्या समाधानकारक पावसामुळे यंदा राज्यात उसाचे जम्बो उत्पादन झाले. या वर्षी २०० साखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू केला. याशिवाय राज्यभरातील हजारो रसवंतिगृहांमधून उसाचे गाळप झाले. तरीदेखील शिल्लक उसाचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. पावसाळा तोंडावर असताना जूनच्या पहिल्या आठवड्यातही राज्यातील २६ साखर कारखाने अजूनही सुरू आहेत. आतापर्यंत साखर कारखान्यांमधून एक हजार ३१७ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. गेल्या वर्षी संपूर्ण हंगामात एक हजार १४ लाख टन उसाचे गाळप झाले होते. गेल्या वर्षाच्या तुलनेने साखर उत्पादनात २० टक्के वाढ अपेक्षित आहे.

मुबलक उसामुळे राज्यात १०१ सहकारी व ९९ खासगी अशा एकूण २०० कारखान्यांचा गळीत हंगाम ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये सुरू झाला. गेल्या वर्षी हीच संख्या १९० होती. या वर्षी ऊस उपलब्ध असल्यामुळे बहुतांश कारखाने मेअखेर सुरू राहिले. कोल्हापूर, अमरावती व नागपूर या तीन विभागांतील सर्व कारखाने बंद आहेत. पुणे विभागातून केवळ एक कारखाना, तर सोलापूर विभागातून तीन कारखाने सुरू आहेत. नांदेडमधून सहा, अहमदनगर पाच, तर औरंगाबाद विभागातून सर्वाधिक ११ कारखान्यांचा गळीत हंगाम अद्यापही सुरू आहे. १० ते १५ जूनपर्यंत हे कारखाने सुरू राहू शकतील. हंगाम संपल्यानंतरही शिल्लक उसाचा प्रश्‍न कायम राहण्याची शक्यता आहे.

चार महिन्यांपासून राज्यभरातील हजारो रसवंतिगृह सुरू आहेत. त्यामुळे हजारो टन ऊस रसवंतींना लागला. गेल्या वर्षापेक्षा या वर्षी आतापर्यंत ३०५ लाख क्विंटल साखरेचे अधिक उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षी संपूर्ण हंगामात एक हजार ६४ लाख क्विंटल उत्पादन झाले. या वर्षी ३ जूनअखेर एक हजार ३६९ लाख क्विंटल साखरेचे गाळप झाले असून, काही कारखाने अजून दहा ते बारा दिवस सुरू राहतील. त्यामुळे या वर्षी राज्यात साखरेचे विक्रमी उत्पादन होणार आहे.

औरंगाबाद विभागात शिल्लक उसाचा प्रश्‍न अधिक तीव्र आहे. विभागात १४ सहकारी व ११ खासगी असे एकूण २५ कारखाने सुरू झाले. ३ जूनअखेर १४ कारखान्यांचा हंगाम संपला. अजूनही ११ कारखान्यांमधून उसाचे गाळप केले जात आहे. हंगाम लांबल्यामुळे बहुसंख्य ऊसतोडणी कामगारही अजूनही गावी परतलेले नाहीत.

३ जूनअखेर ऊसगाळप स्थिती

विभाग कारखान्यांची संख्या ऊसगाळप (लाख टन) साखर उत्पादन (लाख क्विंटल) बंद झालेले कारखाने

कोल्हापूर ३६ २५४.६९ ३००.४१ ३६

पुणे ३० २६९.८५ २९१.२४ २९

सोलापूर ४७ ३००.१४ २८३.९१ ४४

अहमदनगर २८ १९९.३७ १९९.७२ २३

औरंगाबाद २५ १३१.७४ १२८.३७ १४

नांदेड २७ १४६.४३ १५२.४७ २१

अमरावती ३ १०.०३ ९.६७ ३

नागपूर ४ ४.५५ ३.८२ ४

एकूण २०० १३१६.८ १३६९.६१ १७४

"राज्यातील मराठवाडा विभागातील काही साखर कारखाने अद्याप सुरू आहेत. १५ जूनपर्यंत कारखाने सुरू राहिले तरीदेखील ऊस शिल्लक राहणार आहे. शासनाने शिल्लक उसापोटी शेतकऱ्यांना एकरी एक लाख रुपये अनुदान देऊन दिलासा द्यावा."

- कुबेर जाधव, समन्वयक, स्वाभिमानी शेतकरी संघटना, महाराष्ट्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, PAK vs SL: साहिबजादा फरहानचे शतकासह विश्वविक्रम, पाकिस्तान २०० पार; पण श्रीलंकेत फिक्सिंगची चर्चा; जाणून घ्या कारण

Ganja Seized : बारामतीत अडीच कोटींचा 470 किलो गांजा हस्तगत...

Maharashtra GAIL Project: आता वाऱ्यापासून वीज तयार होणार! गेल महाराष्ट्रात मेगा प्रकल्प उभारणार; पवनऊर्जा विस्ताराला बूस्ट मिळणार

Ajit Pawar, DGCA Report आला समोर, आदिती तटकरे थेट बोलल्या...

Latest Marathi News Live Update : बर्ड फ्लूच्या खबरदारीमुळे संजय गांधी बायोलॉजिकल पार्क तात्पुरते बंद करण्यात आले

SCROLL FOR NEXT