Sugar production  esakal
नाशिक

राज्यात जम्बो उत्पादनामुळे साखर निर्मितीत 20 टक्के वाढ

गोकुळ खैरनार : सकाळ वृत्तसेवा

मालेगाव (नाशिक) : सलग दोन वर्षे झालेल्या समाधानकारक पावसामुळे यंदा राज्यात उसाचे जम्बो उत्पादन झाले. या वर्षी २०० साखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू केला. याशिवाय राज्यभरातील हजारो रसवंतिगृहांमधून उसाचे गाळप झाले. तरीदेखील शिल्लक उसाचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. पावसाळा तोंडावर असताना जूनच्या पहिल्या आठवड्यातही राज्यातील २६ साखर कारखाने अजूनही सुरू आहेत. आतापर्यंत साखर कारखान्यांमधून एक हजार ३१७ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. गेल्या वर्षी संपूर्ण हंगामात एक हजार १४ लाख टन उसाचे गाळप झाले होते. गेल्या वर्षाच्या तुलनेने साखर उत्पादनात २० टक्के वाढ अपेक्षित आहे.

मुबलक उसामुळे राज्यात १०१ सहकारी व ९९ खासगी अशा एकूण २०० कारखान्यांचा गळीत हंगाम ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये सुरू झाला. गेल्या वर्षी हीच संख्या १९० होती. या वर्षी ऊस उपलब्ध असल्यामुळे बहुतांश कारखाने मेअखेर सुरू राहिले. कोल्हापूर, अमरावती व नागपूर या तीन विभागांतील सर्व कारखाने बंद आहेत. पुणे विभागातून केवळ एक कारखाना, तर सोलापूर विभागातून तीन कारखाने सुरू आहेत. नांदेडमधून सहा, अहमदनगर पाच, तर औरंगाबाद विभागातून सर्वाधिक ११ कारखान्यांचा गळीत हंगाम अद्यापही सुरू आहे. १० ते १५ जूनपर्यंत हे कारखाने सुरू राहू शकतील. हंगाम संपल्यानंतरही शिल्लक उसाचा प्रश्‍न कायम राहण्याची शक्यता आहे.

चार महिन्यांपासून राज्यभरातील हजारो रसवंतिगृह सुरू आहेत. त्यामुळे हजारो टन ऊस रसवंतींना लागला. गेल्या वर्षापेक्षा या वर्षी आतापर्यंत ३०५ लाख क्विंटल साखरेचे अधिक उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षी संपूर्ण हंगामात एक हजार ६४ लाख क्विंटल उत्पादन झाले. या वर्षी ३ जूनअखेर एक हजार ३६९ लाख क्विंटल साखरेचे गाळप झाले असून, काही कारखाने अजून दहा ते बारा दिवस सुरू राहतील. त्यामुळे या वर्षी राज्यात साखरेचे विक्रमी उत्पादन होणार आहे.

औरंगाबाद विभागात शिल्लक उसाचा प्रश्‍न अधिक तीव्र आहे. विभागात १४ सहकारी व ११ खासगी असे एकूण २५ कारखाने सुरू झाले. ३ जूनअखेर १४ कारखान्यांचा हंगाम संपला. अजूनही ११ कारखान्यांमधून उसाचे गाळप केले जात आहे. हंगाम लांबल्यामुळे बहुसंख्य ऊसतोडणी कामगारही अजूनही गावी परतलेले नाहीत.

३ जूनअखेर ऊसगाळप स्थिती

विभाग कारखान्यांची संख्या ऊसगाळप (लाख टन) साखर उत्पादन (लाख क्विंटल) बंद झालेले कारखाने

कोल्हापूर ३६ २५४.६९ ३००.४१ ३६

पुणे ३० २६९.८५ २९१.२४ २९

सोलापूर ४७ ३००.१४ २८३.९१ ४४

अहमदनगर २८ १९९.३७ १९९.७२ २३

औरंगाबाद २५ १३१.७४ १२८.३७ १४

नांदेड २७ १४६.४३ १५२.४७ २१

अमरावती ३ १०.०३ ९.६७ ३

नागपूर ४ ४.५५ ३.८२ ४

एकूण २०० १३१६.८ १३६९.६१ १७४

"राज्यातील मराठवाडा विभागातील काही साखर कारखाने अद्याप सुरू आहेत. १५ जूनपर्यंत कारखाने सुरू राहिले तरीदेखील ऊस शिल्लक राहणार आहे. शासनाने शिल्लक उसापोटी शेतकऱ्यांना एकरी एक लाख रुपये अनुदान देऊन दिलासा द्यावा."

- कुबेर जाधव, समन्वयक, स्वाभिमानी शेतकरी संघटना, महाराष्ट्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Violence : बाजूलाच सर्किट बेंच, वीज खंडित, प्रचंड गोंधळ, तलवारी, पोती भरून दगडं; अपुरी पोलिस यंत्रणा, कोल्हापुरात दोन गटातील राड्याचा घटनाक्रम असा...

Toll Free Scheme: ‘समृद्धी’वर चाचणीतच कटला ईव्ही वाहनांचा टोल! शासनाची घोषणा ठरली फोल, तांत्रिक अडचणी पाठ सोडेनात

Dhanashree Verma च्या सपोर्टमध्ये उतरली सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा; म्हणाली, तुझ्या प्रती आदर...! नेटिझन्स म्हणायला लागले....

Latest Marathi News Updates : नागपूरसाठी ऐतिहासिक परंपरा लाभलेली काळी पिवळी मारबत मिरवणूक आज निघणार

PMC News : महापालिकेची मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी कडक पावले; १७ हजार कोटी रुपये अद्याप येणे, महापालिकेकडून विविध उपाययोजनांवर भर

SCROLL FOR NEXT