yogesh.jpg 
नाशिक

दुचाकीला पिकअपची धडक; अपघातात युवा शेतकरी ठार

राजेंद्र पगार

नाशिक : (कळवण) दुपासच्या सुमारास शेतात डबे देऊन युवा शेतकरी घरी परतत होता. चुकीच्या दिशेने येणाऱ्या पिकअपच्या जोरदार धडकेने जबर अपघात झाला. या अपघातात त्या शेतकऱ्याला गंभीर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. याबाबत कळवण पोलीस ठाण्यात मोटार अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशी आहे घटना

योगेश बाळासाहेब पाटील हा सोमवार (ता. 31) रोजी दुपारी 1.30 वाजता त्यांचा गांगवन शिवारातील शेतात जेवणाचे डबे देण्यास गेला होता. डबे देऊन कळवण येथे दुचाकीवरून (एम एच 41. ए ई 9095) परत येत होता. कळवणकडून मोकभणगीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या पिकअप गाडी (एम एच 15. एफ व्ही 3187) ने नाकोडा शिवारातील मोतीराम दादाजी गुंजाळ यांचे शेताजवळ चुकीच्या दिशेला जाऊन जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वार योगेश पाटील हा जबर जखमी झाला. जखमी योगेशला योगेश शंकर पगार यांनी ट्रॅक्टरमध्ये घेऊन कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले. त्यास डोके व हात पाय यास गंभीर दुखापत झाल्याने येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी नाशिक येथे पाठवले. 

नाशिक येथे उपचारासाठी घेऊन जात असताना वणी गावाजवळ तोंडाला फेस आल्याने वणी येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी नेले. मात्र तेथील डॉक्टरांनी तपासणी करून त्यास मृत घोषित केले. मयत योगेश पाटील यास कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयात आणून शवविच्छेदन करण्यात आले. याबाबत कळवण पोलीस ठाण्यात मोटार अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस संदीप कडाळे व पोलीस घोडे करीत आहेत. 

संपादन - किशोरी वाघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Video : ''भारतात तुम्ही मला सुरक्षा देऊ शकत नाही का?'', राहुल गांधींची पोलिसांबरोबर बाचाबाची, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Mumbai Health Report: राज्यात पावसाळी आजारांचा कहर; मुंबईत सर्वाधिक रुग्णांची नोंद

ब्रिटिशांच्या १८८१ व करवीर संस्थानच्या १९०२ च्या गॅझेटिरमध्ये मराठा व कुणबी एकच, तरीही मराठा समाजाला झगडावं लागतय; कोल्हापुरात आंदोलन पेटणार

Indira Ekadashi 2025: पूर्वजांना मुक्त करण्यासाठी महिलांनी काय करू नये, जाणून घ्या नियम

Latest Marathi News Updates : परतीच्या पावसामुळे पाणीपातळीत वाढ, मुंबईतील धरणांत ९८.८२ टक्के पाणीसाठा

SCROLL FOR NEXT