Zilla Parishad nashik
Zilla Parishad nashik esakal
नाशिक

Mission Bhagirath Prayas : मजुरांचे स्थलांतर रोखण्यासाठी जिल्हा परिषद सरसावली

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : टंचाईमुक्त करण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनांतर्गत जिल्हा परिषदमार्फत ‘मिशन भगीरथ प्रयास योजना’ हाती घेण्यात आली आहे.

ही योजना यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद अधिकाऱ्यांनी अलवार (राजस्थान) दौरा केला (Zp take action to prevent migration of labourers by spread awareness about Mission Bhagiratha Prayas will among villagers nashik news)

यानंतर आता जनजागृती आणि प्रबोधनावर जिल्हा परिषदेने भर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी गावागावांमध्ये जाऊन बैठका घेऊन प्रबोधन केले जाणार आहे. यात मजुरांना गावातच काम देऊन त्यांचे होणारे स्थलांतरणदेखील रोखले जाणार आहे.

जिल्हा परिषदमार्फत ‘मिशन भगीरथ प्रयास योजना’करिता एकदिवसीय कार्यशाळा झाली. कार्यशाळेत मार्गदर्शन करताना जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी राजस्थान राज्यात केलेल्या जलसंधारण कामांची यशोगाथा कथन केली.

त्यासाठी केलेल्या उपाययोजनांची व नियोजनाची माहिती दिली. त्याअनुषंगाने लघुपाटबंधारे विभागांतर्गत २६ अधिकारी व कर्मचारी यांनी अलवर येथे झालेल्या जलसंधारण कामांची पाहणी दौरा नुकताच केला. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र नंदनवार यांच्यासह २६ अधिकारी व कर्मचारी यांचा सहभाग होता.

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

या पथकाने काही गावांमध्ये कामांची पाहणी केली. डॉ. राजेंद्र सिंह यांच्याशी चर्चा केली. गावागावांतील प्रबोधन, लोकांचा सहभाग या जोरावर ही योजना यशस्वी केल्याचे या वेळी सांगण्यात आले. आता याच धर्तीवर नाशिक जिल्ह्यातही जनजागृती व प्रबोधन जिल्हा परिषदेमार्फत केले जाणार आहे.

प्रत्यक्ष लोकांचा सहभाग घेतल्याशिवाय गावात बंधारे, दुरुस्ती होणे अशक्य आहे. ही कामे करण्यासाठी मार्च ते जून या चार महिन्यांचा कालावधी आहे. मात्र या कालावधीत टंचाई असल्याकारणाने प्रामुख्याने सुरगाणा, पेठ, त्र्यंबकेश्वर, कळवण या तालुक्यांमधून मजुरांचे स्थलांतरण होते.

हे स्थलांतरण होऊ नये, यासाठी गावामध्येच त्यांना नरेगांतर्गत काम उपलब्ध करून दिले जाणार आहे. यासाठी गावागावांत जाऊन बैठका घेण्याचे नियोजन केले जाणार असल्याचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गुंडे यांनी सांगितले. मिशन भगीरथ प्रयास अंतर्गत सद्यःस्थितीत पेठ व सुरगाणा येथे मोठ्या प्रमाणावर कामांना सुरवात झाली आहे.

गटविकास अधिकाऱ्यांनाही सूचना

विभागप्रमुख-गटविकास अधिकारी यांच्या झालेल्या समन्वय बैठकीतही मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी प्रामुख्याने मजुरांचे स्थलांतरण होणार नाही यासाठी योग्य ते नियोजन करा, अशा सूचना केल्या आहेत. गावांमध्ये नरेगांतर्गत कामे आहे. यात मजुरांना गावातच कामे देण्यावर भर द्यावा, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

"अलवार येथील दौऱ्यात तेथील कामांची पाहणी केली. गावागावांत प्रबोधन, लोकांच्या सहभागातून ही कामे उभी राहिली आहेत. याच धर्तीवरच जिल्हा परिषदेतर्फे प्रबोधन व लोकांचा सहभाग वाढविण्यासाठी गावागावांत बैठका घेणार आहे. सुरगाणा तालुक्यापासून या बैठकांना सुरवात केली जाणार आहे." - डॉ. अर्जुन गुंडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

Lok Sabha Election: PM मोदींच्या सभेमुळे ६ ठिकाणी वाहनतळ, ५ ठिकाणचे रस्ते बंद, २० मिनीटे अंत्ययात्रा रोखली

Mumbai Crime News: मानखुर्दमध्ये २७ वर्षीय तरुणीची हत्या; 'लव्ह जिहाद' म्हणत धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न

Latest Marathi News Live Update : तुमची संपत्ती लुटणारं सरकार तुम्हाला हवं आहे का? पंतप्रधान मोदींची पुन्हा काँग्रेसवर टीका

SCROLL FOR NEXT