TET Exam
TET Exam esakal
उत्तर महाराष्ट्र

TET Exam : ‘टेट’च्या परीक्षेसाठी भलतेच केंद्र; विद्यार्थ्यांचा गोंधळ अन् गैरसोय

सकाळ वृत्तसेवा

नवापूर (जि. नंदुरबार) : शिक्षक अभियोग्यता चाचणी (टेट) (TET) साठी परीक्षार्थींना त्यांनी निवडलेले परीक्षा केंद्र न देता भलत्याच ठिकाणी परीक्षा केंद्र दिल्याने आर्थिकसह इतर गैरसोय होणार असल्याने तारांबळ उडाली आहे.

ही परीक्षा ‘आयबीपीएस’ कंपनीमार्फत होत असून, यात केंद्रवाटपाचा मोठा घोळ झाला आहे. (tet exam confusion about exam centre in examinees nandurbar news)

नंदुरबार परीक्षा केंद्र निवडलेल्या विद्यार्थ्यांना औरंगाबाद येथील चिखलठाणा, जळगाव येथील धरणगाव हे केंद्र देण्यात आले आहे. नंदुरबार, धुळेमध्ये सुविधा उपलब्ध असतानाही येथील अनेकांना चक्क औरंगाबाद केंद्र दिले गेले.

त्यामुळे विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला. अनेकांनी परीक्षा परिषदेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, रविवार असल्याने त्यांना दाद मिळाली नाही

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टेट) परीक्षा २२ फेब्रुवारीपासून ३ मार्चपर्यंत होत आहे. मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून ८५०, तर खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्याकडून ९५० रुपये इतक शुल्क घेतले आहे. हजार रुपयापेक्षा अधिक खर्च केलेल्या विद्यार्थ्यांच्या हाती रविवारी परीक्षेचे हॉल तिकीट आले.

मात्र, त्यात भलतेच परीक्षा केंद्र पाहून अनेकजण चक्रावले. या परीक्षेसाठी उमेदवारांना तीन केंद्रांचे पर्याय देण्यात आले होते. नंदुरबार जिल्ह्यातील बहुतांश विद्यार्थ्यांनी नंदुरबार, धुळे, नाशिक हे परीक्षा केंद्र प्राधान्याने भरले होते.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

अडीच लाख उमेदवार गोंधळात

परीक्षा परिषदेने ‘टेट’चे आयोजन ‘आयबीपीएस’ कंपनीकडे दिले आहे. जवळपास लाख विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. परीक्षा शुल्काच्या माध्यमातून जवळपास २५ कोटी रुपये गोळा झाले आहेत. तरीही परीक्षा केंद्राचे नियोजन व्यवस्थित का करण्यात आले नाही, असा सवाल नंदुरबार, धुळे जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांनी केला आहे.

विद्यार्थ्यांना परीक्षेच्या एक तास आधी केंद्रावर पोचावे लागणार आहे. औरंगाबादच्या चिखलठाणा केंद्रावर पोहोचण्यासाठी नंदुरबारच्या विद्यार्थ्यांनी नेमके एक दिवस आधी निघावे लागणार आहे. त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड सोसावणार लागणार आहे.

"शिक्षण घेऊन बराच कालावधी गेला. नोकरी नाही, रोजगार नाही, ‘टेट’ परीक्षा देऊनही नोकरीची शाश्वती नाही. यात परीक्षा घेणाऱ्या कंपनीने तर कहरच केला, जवळचे परीक्षा केंद्र सोडून दोनशे ते अडीचशे किलोमीटरवरील केंद्र दिल्याने हा विद्यार्थ्यांचा छळ आहे. लांब प्रवास करून विद्यार्थी शारीरिक व मानसिकरीत्या थकल्यावर तो कोणत्या प्रकारे पूर्ण क्षमतेने परीक्षेला सामोरे जाईल." - संदीप सूर्यवंशी, नवापूर, परीक्षार्थी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी तीन वाजेपर्यंत देशात 50.71 टक्के मतदान; महाराष्ट्र अजूनही सगळ्यात मागे

Fact Check : कोरोना लसीसंदर्भातील बातम्यांमुळे लस प्रमाणपत्रात बदल करण्यात आले नाहीत; व्हायरल होत असलेला दावा चुकीचा

जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश! चकमकीत लष्करचा प्रमुख बासित अहमद डारसह तीन दहशतवादी ठार

Kushal Badrike : "... ओळखीचे चेहरे अनोळख्या स्टेशनवर निघून जातात"; कुशलने व्यक्त केली खंत

Summer Home Decor Tips: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा करुन घ्या फायदा; 'अशा' पद्धतीने करा घराचा मेकओव्हर.. सर्वजण पाहतच राहतील

SCROLL FOR NEXT