Three children drowned in two incidents in Navapur taluka nandurbar news
Three children drowned in two incidents in Navapur taluka nandurbar news esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : नवापूर तालुक्यातील दोन घटनांत तीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : तालुक्यातील दोन घटनांत तीन मुलांचा बुधवारी (ता. २७) पाण्यात बुडून मृत्यू झाला. निखिल कैलास राजपूत, आर्यन गोरख वळवी व प्रीतम गोरख वळवी या तिघांचा यात समावेश आहे.

नवापूर शहरातील प्रभाकर कॉलनीतील १७ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली. घटनेनंतर प्रभाकर कॉलनीसह शहरातील रहिवाशांनी नवापूर उपजिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी केली. युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने आई-वडिलांच्या आक्रोशाने सर्वांचे डोळे पाणावले.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार निखिल राजपूत हा शहरातील सार्वजनिक गुजराती हायस्कूलमध्ये वाणिज्य शाखेत अकरावीत शिकत होता. (Three children drowned in two incidents in Navapur taluka nandurbar news)

सकाळच्या सत्रात महाविद्यालयात गेला. दुपारी दीडच्या सुटीत परत महाविद्यालयात न जाता घरी जेवण करून बाहेर जाण्याचे नियोजन केले. निखिल याने घरी जेवण केल्यावर इन्सुलिनचे इंजेक्शन घेतले. त्यानंतर भवरे (ता. नवापूर) धरणावर चार वर्गमित्रांबरोबर फिरण्यासाठी गेला. निखिल धरणात अंघोळ करीत असताना पाण्यात बुडू लागल्याने त्याच्या मित्रांनी आरडाओरड केली. त्याच्या वर्गमित्रांना पोहता येत नव्हते.

त्याला वाचविण्यासाठी काही वेळातच जवळील गुराख्याची मदत घेतली. त्याला पाण्यातून बाहेर काढले. लगेच, उपचारांसाठी नवापूर उपजिल्हा रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले, अशी माहिती नातेवाईक व वर्गमित्रांनी दिली. घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक विशाल पाटील, हवालदार दादाभाई वाघ आदींनी पाहणी केली. निखिलचे वडील मानस हॉटेलमध्ये व्यवस्थापक म्हणून कामाला आहेत. मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच आईची तब्येत बिघडली. त्यांच्यावर नवापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुलांच्या मृत्यूने आई-वडिलांचा हंबरडा

मोगराणी ग्रामपंचायत अंतर्गत बर्डीपाडा (ता. नवापूर) धरणात दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. बर्डीपाडा धरणात आर्यन गोरख वळवी (वय १४), प्रीतम गोरख वळवी (१२) असे दोघे सख्खे भाऊ त्यांच्या शेतालगत धरणाजवळ गेले. पाण्याचा अंदाज न आल्याने दोन भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. स्थानिक ग्रामस्थांनी त्यांना बाहेर काढून वाचविण्याचा प्रयत्न केला.

उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आले; परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती कळताच ग्रामस्थांनी खांडबारा ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याने आई-वडिलांनी प्रचंड आक्रोश केला. विच्छेदनासाठी खांडबारा ग्रामीण रुग्णालयात मृतदेह नेण्यात आले. खांडबारा पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: विधानसभेपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होणार? बंडखोर ठाकरे-पवारांकडे परतणार?

केदार जाधवने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून केली निवृत्तीची घोषणा

Election Commission : ''सिस्टीममध्ये कुठलीही चूक होऊ शकत नाही'', मतमोजणीच्या तयारीबद्दल मुख्य आयुक्त राजीव कुमार म्हणाले...

Priyanka Chopra Beauty Tips: चमकदार त्वचेसाठी देसी गर्लने शेअर केली बॉडी स्क्रब बनवण्याची सोपी पद्धत

Bengluru Viral Video : बंगळुरूमध्ये कोकोनट अटॅकरची दहशत ; भरदिवसा गाडी फोडली, व्हायरल होतोय व्हिडीओ

SCROLL FOR NEXT