त्र्यंबकेश्‍वर - ग्रामीण पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याने पहिने घाटात पर्यटकांची गर्दी झाल्यानंतर घाटातील रस्त्यावरच उभी केलेली चारचाकी वाहने. 
उत्तर महाराष्ट्र

पर्यटकांमुळे वीकेंडला घाटरस्त्यांवर कोंडी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक - पावसाळा सुरू झाला, की घाटमाथ्यांवर ओल्याचिंब निसर्गाच्या सान्निध्यात रममाण होण्यासाठी पर्यटकांची रेलचेल वाढते. अशीच अवस्था गेल्या वीकेंडला नाशिक जिल्ह्यातील घाटमाथ्यांवर झाली. इगतपुरी, त्र्यंबकेश्‍वर परिसरातील डोंगररांगांमध्ये पाऊस मुसळधार कोसळत असताना त्याचा आनंद लुटण्यासाठी शहर, परजिल्ह्यातील पर्यटकांनी वाहनांसह गर्दी केल्यामुळे घाट रस्त्यांवर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.

इतकेच नव्हे तर धोकादायक वळणांवर वाहने थांबवून पर्यटकांकडून ‘सेल्फी’ही घेतले जात असल्याने यातून भीषण दुर्घटनेचीही शक्‍यता नाकारता येत नाही. अशा ठिकाणी पोलिसांची अनुपस्थिती दिसून आली असली तरी खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले.

संततधारेने इगतपुरी, त्र्यंबकेश्‍वरच्या डोंगररांगांवरील धबधबे वाहू लागले आहेत. अनेक ठिकाणी तर ओहोळ-नाले दुथडी भरून वाहत आहेत. अशा या पावसाळी निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी नाशिकसह लगतच्या मुंबईतून पर्यटक वीकेंडसाठी घाटमाथ्याकडे धाव घेत आहेत. विशेषत: घाटरस्ते अरुंद असून, डोंगररांगांमधून हे रस्ते असल्याने काही ठिकाणी अत्यंत धोकादायक वळणे आहेत. त्यात मुसळधार पाऊस आणि रस्त्यावर वाहत येणारा चिखल यामुळे रस्तेही धोकादायक झालेले असताना, अशा मार्गावरून भरधाव वाहने चालविण्याने दुर्घटनेची शक्‍यता आहे. काही धोकादायक वळणांवर पर्यटक वाहने थांबवून ‘सेल्फी’ घेतात. यातूनही दुर्घटनेची शक्‍यता आहे.  

धोकादायक घाटरस्ते
वीकेंडला नाशिक-त्र्यंबक रोडवरील पहिनेचा घाटरस्ता, त्र्यंबकेश्‍वर-जव्हार रस्त्यावरील दुगारवाडी धबधबा, इगतपुरीतील वाडा घाटरस्ता, कसारा घाट, इगतपुरी-घोटी घाटरस्ता, घोटी-भंडारदरा घाटरस्त्यावर पर्यटकांच्या वाहनांची अक्षरश: गर्दी असते. दोन वर्षांपूर्वी पहिनेच्या डोहात चौघांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली होती. 

गांभीर्याचा अभाव
पावसाळ्यात धोकादायक ठिकाणी सेल्फी न घेण्याचे आवाहन वारंवार केल्यानंतरही पर्यटकांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जाते, तर नाशिक ग्रामीण पोलिसांनाही याचे गांभीर्य नसल्याचेच त्यांच्या गैरहजेरीतून समोर आले आहे. पोलिसांकडून केवळ घाटरस्त्यांवर बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. काही मार्गांवर नाकाबंदीच्या ठिकाणीही पोलिसांकडून कोणत्या सूचना पर्यटकांना दिल्या जात नाहीत. त्यामुळे घाटमाथ्यावरील धोकादायक परिस्थितीमध्ये मार्ग बंद करणे अपेक्षित आहे. 

खबरदारीच्या उपाययोजना
ग्रामीण पोलिस आणि वन विभाग यांचे संयुक्त पथक पावसाळी पर्यटनांच्या ठिकाणी नेमले आहे. मद्यपींच्या शक्‍यतेने ग्रामीण वाहतूक शाखेकडून ड्रंक ॲन्ड ड्राइव्हचीही कारवाई केली जाणार आहे. कुटुंबीयांसह पर्यटक येत असल्याने महिला पोलिस कर्मचारी, रेस्क्‍यू ऑपरेशन टीम अशा उपाययोजना केल्याचे ग्रामीण पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बीडमध्ये चाललंय काय? जमिनीच्या वादातून माजी सरपंचाची दहशत; रक्तबंबाळ होईपर्यंत तरुणाला बेदम मारहाण, पोलिसांवर राजकीय दबाव?

Latest Marathi News Updates : पुण्यात पीएमपीच्या ब्रेकडाऊनमध्ये वाढ, एका महिन्यात २४०० घटना

Health Insurance Updated Rules: आता फक्त २ तास ॲडमिट होऊनही क्लेम करता येणार हेल्थ इन्शुरन्स! जाणून घ्या योजना

Sindhudurg : सोनाली गावडे मृत्यू प्रकरण, ‘ती’ दुसरी छत्री कोणाची? बांदा पोलिसांसमोर गूढ उकलण्याचे आव्हान

Eknath Shinde Delhi Visit : पावसाळी अधिवेशन सुरु असताना एकनाथ शिंदेंचं दिल्ली वारी, अमित शहांसह वरिष्ठ नेत्यांची घेतली भेट, नेमकी काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT