त्र्यंबकेश्‍वर - ग्रामीण पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याने पहिने घाटात पर्यटकांची गर्दी झाल्यानंतर घाटातील रस्त्यावरच उभी केलेली चारचाकी वाहने.
त्र्यंबकेश्‍वर - ग्रामीण पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याने पहिने घाटात पर्यटकांची गर्दी झाल्यानंतर घाटातील रस्त्यावरच उभी केलेली चारचाकी वाहने. 
उत्तर महाराष्ट्र

पर्यटकांमुळे वीकेंडला घाटरस्त्यांवर कोंडी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक - पावसाळा सुरू झाला, की घाटमाथ्यांवर ओल्याचिंब निसर्गाच्या सान्निध्यात रममाण होण्यासाठी पर्यटकांची रेलचेल वाढते. अशीच अवस्था गेल्या वीकेंडला नाशिक जिल्ह्यातील घाटमाथ्यांवर झाली. इगतपुरी, त्र्यंबकेश्‍वर परिसरातील डोंगररांगांमध्ये पाऊस मुसळधार कोसळत असताना त्याचा आनंद लुटण्यासाठी शहर, परजिल्ह्यातील पर्यटकांनी वाहनांसह गर्दी केल्यामुळे घाट रस्त्यांवर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.

इतकेच नव्हे तर धोकादायक वळणांवर वाहने थांबवून पर्यटकांकडून ‘सेल्फी’ही घेतले जात असल्याने यातून भीषण दुर्घटनेचीही शक्‍यता नाकारता येत नाही. अशा ठिकाणी पोलिसांची अनुपस्थिती दिसून आली असली तरी खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले.

संततधारेने इगतपुरी, त्र्यंबकेश्‍वरच्या डोंगररांगांवरील धबधबे वाहू लागले आहेत. अनेक ठिकाणी तर ओहोळ-नाले दुथडी भरून वाहत आहेत. अशा या पावसाळी निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी नाशिकसह लगतच्या मुंबईतून पर्यटक वीकेंडसाठी घाटमाथ्याकडे धाव घेत आहेत. विशेषत: घाटरस्ते अरुंद असून, डोंगररांगांमधून हे रस्ते असल्याने काही ठिकाणी अत्यंत धोकादायक वळणे आहेत. त्यात मुसळधार पाऊस आणि रस्त्यावर वाहत येणारा चिखल यामुळे रस्तेही धोकादायक झालेले असताना, अशा मार्गावरून भरधाव वाहने चालविण्याने दुर्घटनेची शक्‍यता आहे. काही धोकादायक वळणांवर पर्यटक वाहने थांबवून ‘सेल्फी’ घेतात. यातूनही दुर्घटनेची शक्‍यता आहे.  

धोकादायक घाटरस्ते
वीकेंडला नाशिक-त्र्यंबक रोडवरील पहिनेचा घाटरस्ता, त्र्यंबकेश्‍वर-जव्हार रस्त्यावरील दुगारवाडी धबधबा, इगतपुरीतील वाडा घाटरस्ता, कसारा घाट, इगतपुरी-घोटी घाटरस्ता, घोटी-भंडारदरा घाटरस्त्यावर पर्यटकांच्या वाहनांची अक्षरश: गर्दी असते. दोन वर्षांपूर्वी पहिनेच्या डोहात चौघांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली होती. 

गांभीर्याचा अभाव
पावसाळ्यात धोकादायक ठिकाणी सेल्फी न घेण्याचे आवाहन वारंवार केल्यानंतरही पर्यटकांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जाते, तर नाशिक ग्रामीण पोलिसांनाही याचे गांभीर्य नसल्याचेच त्यांच्या गैरहजेरीतून समोर आले आहे. पोलिसांकडून केवळ घाटरस्त्यांवर बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. काही मार्गांवर नाकाबंदीच्या ठिकाणीही पोलिसांकडून कोणत्या सूचना पर्यटकांना दिल्या जात नाहीत. त्यामुळे घाटमाथ्यावरील धोकादायक परिस्थितीमध्ये मार्ग बंद करणे अपेक्षित आहे. 

खबरदारीच्या उपाययोजना
ग्रामीण पोलिस आणि वन विभाग यांचे संयुक्त पथक पावसाळी पर्यटनांच्या ठिकाणी नेमले आहे. मद्यपींच्या शक्‍यतेने ग्रामीण वाहतूक शाखेकडून ड्रंक ॲन्ड ड्राइव्हचीही कारवाई केली जाणार आहे. कुटुंबीयांसह पर्यटक येत असल्याने महिला पोलिस कर्मचारी, रेस्क्‍यू ऑपरेशन टीम अशा उपाययोजना केल्याचे ग्रामीण पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harsh Goenka: हर्षद मेहता युग परत आले? शेअरच्या किमतीत होतेय फेरफार; हर्ष गोयंका यांची अर्थ मंत्रालयाकडे तक्रार

KKR IPL 2024 : KKR जिंकणार यंदाची IPL ची ट्रॉफी? जसं 2012 मध्ये झालं तसंच 2024 मध्ये होतय....

CBSE Board : दहावीमध्ये मुलभूत गणित शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ११ वीमध्ये स्टॅंडर्ड मॅथ्स हा विषय घेता येणार

Arvinder Singh Lovely : दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणारे अरविंदर सिंह लवली अखेर भाजपमध्ये दाखल

Latest Marathi News Live Update: राहुल गांधींना 'शेहजादा' म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींवर प्रियंका गांधींचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT