Marriage
Marriage 
उत्तर महाराष्ट्र

पैशांसाठी दलालांनी लावले तरुणीचे दोन विवाह

सकाळ वृत्तसेवा

धरणगाव - नागपूरच्या दलालांनी पैशांसाठी एकाच तरुणीचे तालुक्यातील दोन तरुणांशी विवाह लावून फसवणूक केली आहे. ही घटना शुक्रवारी (ता. २७) उघडकीस आली आहे. फसवणूक करणारे हे मोठे रॅकेट असून, अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. याप्रकरणी येथील पोलिस ठाण्यात आज तरुणीसह संशयित दलालांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 

बोरगाव (ता. धरणगाव) येथील सुरेश यादव पाटील यांचे पुत्र रवींद्र पाटील याच्याशी आचल हिचा बोरगावच्या विठ्ठल मंदिरात विवाह झाला. सुशिक्षित व उच्चशिक्षित असलेल्या आचलचे खेडेगावात चित्त लागत नसल्याचे तिने त्यांना सांगितले. राजू भोपचे, निशांत पटवे, अंकुश पटवे यांनी मला येथे आणून माझा विवाह लावून दिला. मला बोरगावला काहीएक त्रास झालेला नाही. मात्र, मला येथे राहायची इच्छा नसल्याने मी जाणार असल्याचे तिचे म्हणणे आहे. दलालांनी वरपक्षाकडून घेतलेले पैसे मी नागपूर गेल्यावर पाठवून देईन असेही तीने सांगितले. काल रात्री आचल नागपूर जाण्यासाठी एरंडोल येथे आली होती. मात्र, ग्रामस्थांनी तिला समजावून परत बोरगावला नेले. धरणगाव पोलिसांना घटनेची  माहिती देऊन तीला नागपूर पाठवून असा निर्णय ग्रामस्थांनी घेतला. याअनुषंगाने आज सकाळी साडेअकराला तिला पोलिसांसमोर हजर करण्यात आल्यानंतर तीने सर्व कहाणी कथन केली. 

मोठ्या रॅकेटची शक्यता 
आचलने सुमारे वीस दिवसापूर्वी धरणगाव येथील सचिन सुभाष वाघ या मुलाशीही विवाह केला होता. विवाहानंतर अर्ध्या तासातच ती पळून गेल्याचे वाघ कुटुंबीय पोलिस ठाण्यात सांगत होते. या कुटुंबाला देखील आर्थिक झळ पोहचली असून, 
तालुक्यासह खानदेशात अशा अनेक मुली आणल्या गेल्याची चर्चा आहे. नागपूर येथे अशा फसवणुकीचे मोठे रॅकेट असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. सोबत येणारे दलाल पैशांसाठी तरुणींचा विवाह लावून देतात आणि तेच मुलीला पळवून नेतात अशी माहिती उजेडात आली आहे. या प्रकरणातील तरुणी आचल ही नागपूर येथील असून सीआरपीएफ गेट नागपूर येथे राहत असल्याचे सांगत आहे. आचल उर्फ माया देशमुख असे ती नाव सांगत असून तीचे वय वीस वर्ष आहे. 

तरुणीची पोलिसांपुढे आपबिती
राजू भोपचे, निशांत पटवे, अंकुश पटवे यांनी या दोन्ही विवाहसाठी पैसे देण्याच्या बोलीवर मला आणले होते. मात्र, मला पैसे मिळाले नाहीत. माझ्या कुटुंबाला पैशांची गरज असल्याने मी या प्रकरणात अटकली. भविष्यात असे करणार नाही, अशी विनवणी त्या तरुणीने पोलिसांना केली. या टोळीचा महोरक्या ललित पटवे आहे, असेही या तरुणीने सांगितले. बोरगाव ग्रामस्थांनी गावातील तरुणाची फसवणूक झालेली असतानाही तरुणीने सुरक्षित परत जावे यासाठी तिला समजावून पोलिस ठाण्यात हजर केले. शिवसेनेच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या जनाबाई पाटील, उपसरपंच  
मुन्ना पाटील, गोविंद पाटील, नसीर पठाण, नंदू पाटील, स्वप्निल पाटील, डॉ. अतुल सोनवणे आदींनी मध्यस्थी केली. याप्रकरणी रवींद्रने दिलेल्या फिर्यादीवरून तरुणी व दलालांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक पंकज देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबाद पुन्हा 200 पार! रेड्डी अन् क्लासेननं स्लॉग ओव्हरमध्ये राजस्थानला धुतलं

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT