file photo
file photo 
विदर्भ

वर्धा जिल्ह्यातील 155 आरोग्य उपकेंद्रांचा होणार कायापालट

सकाळ वृत्तसेवा

वर्धा : चालू आर्थिक वर्षात जिल्ह्यातील 155 प्राथमिक आरोग्य केंद्रांचा कायापालट होऊन आता नवीन आरोग्य वर्धिनी केंद्र या नावात रूपांतरित करण्यासाठी केंद्र शासनाच्या "आयुष्यमान भारत योजने'तून आरोग्य वर्धिनी केंद्राची निर्मिती केली जाणार आहे. यासाठी 10 कोटी 85 लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती खासदार रामदास तडस यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली.
जिल्ह्यातील एकूण 155 प्राथमिक आरोग्य केंद्रांचा कायापालट होणार आहे. यामध्ये वर्धा तालुक्‍यात 22, सेलू 23, देवळी 20, आर्वी 20, आष्टी 14, कारंजा 16, हिंगणघाट 21 आणि समुद्रपूर तालुक्‍यातील 19 प्राथमिक आरोग्य केंद्रे आरोग्य वर्धिनी म्हणून विकसित होणार आहे. या कामांना 10 कोटी 85 लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता प्रदान झालेली असून कामे निविदा प्रक्रियेमध्ये आहे.
शासनाच्या आयुष्यमान भारत योजनेतून आरोग्य वर्धिनी केंद्रामध्ये सांडपाणी व्यवस्था, अंतर्गत प्रतीक्षा कक्ष, प्रयोग शाळा, वैद्यकीय अधिकारी कक्ष, आंतररुग्ण कक्ष, औषधी साठवण भांडार कक्षांचीही प्राधान्याने दुरुस्ती करण्यात येणार आहे. आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत सर्व समावेशक प्राथमिक आरोग्य सेवा पुरविण्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आरोग्यवर्धिनी केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. सोबतच या केंद्रांमध्ये एक एमबीबीएस डॉक्‍टरचीही नियुक्ती केली जाणार आहे. या केंद्रांतर्गत 13 प्रकारच्या आरोग्य सुविधा दिल्या जातील. त्यात प्रामुख्याने प्रसूतिपूर्व व प्रसूती सेवा, नवजात अर्भक व नवजात शिशुंना दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवा, बाल्यावस्था व किशोरवयीन आरोग्यसेवा तसेच लसीकरण सेवा, कुटुंब नियोजन, गर्भनिरोधक व प्रजननसंबंधी इतर आरोग्यसेवा, सामान्य संसर्गजन्य रोग नियोजन यासह इतर सुविधांचा समावेश राहणार आहे. योग व आयुर्वेद उपचारपद्धतीचाही यात प्रामुख्याने समावेश राहणार आहे, असे खासदार तडस यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: नसीम खान यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेसला यश? पुण्यात धंगेकरांच्या प्रचारासाठी लावली हजेरी

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली, MI आत्मसन्मानासाठी तर KKR प्ले ऑफसाठी खेळणार

Rohit Sharma MI vs KKR : टी 20 वर्ल्डकपचा संघ जाहीर होताच मुंबईच्या प्लेईंग 11 मधून रोहितचं नाव गायब, काय आहे कारण?

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Latest Marathi News Live Update : मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT