214 people died due to not using helmet in chandrapur look back 2020  
विदर्भ

हेल्मेट विसरणे पडले महाग, २१४ नागरिकांनी गमावला जीव

साईनाथ सोनटक्के

चंद्रपूर : दुचाकी चालकांनी हेल्मेट, चारचाकी वाहनचालकांनी सीटबेल्टचा वापर करणे बंधनकारक आहे. वाहतूक शाखेकडून याबाबत वेळोवेळी जनजागृती केली जाते. हेल्मेट, सीटबेल्टचा वापर केल्यास अपघातातून वाचण्याची शक्‍यता असते. मात्र, पोलिसांच्या या उपदेशाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत अनेकजण हेल्मेट, सीटबेल्टचा वापर करीत नाही. त्याचा परिणाम त्यांना जीवाला मुकावे लागले आहे. मागील वर्षभरात जिल्ह्यात झालेल्या 508 अपघातात तब्बल 214 नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. 

चंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा आहे. जिल्ह्यातील रस्त्यांवर नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे दुचाकी, चारचाकी वाहनधारकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन वाहतूक शाखेतर्फे केले जाते. एवढेच नाही, तर शाळा, महाविद्यालयांत शिबिरे आयोजित करून जनजागृती केली जाते. अपघातात कुणालाही जीव गमवावा लागू नये, हा त्या मागील मुख्य उद्देश आहे. मात्र, वाहतूक शाखेच्या या जनजागृतीकडे अनेकजण जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. 
हेल्मेट न घालता दुचाकी आणि सीटबेल्ट न बांधता चारचाकी वाहने चालविले जात आहेत. नियमांचे उल्लंघन करीत वाहन चालविण्याचे प्रकार जिल्ह्यात वाढले आहेत. मागील वर्षभरात 508 अपघाताच्या घटना जिल्ह्यात घडल्या. त्यात मृत्यू झालेल्या अपघातांची संख्या 193 असून, त्यात तब्बल 214 नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. या घटनांतील 60 टक्के मृत्यू हे हेल्मेट न घातल्यामुळे, तर 14 टक्के मृत्यू सीटबेल्टचा वापर न केल्याने झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे दुचाकीस्वारांनी हेल्मेट आणि चारचाकी वाहनचालकांनी सीटबेल्टचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांनी केले आहे.

नवीन वर्षापासून विशेष मोहीम -
जिल्ह्यातील अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी दुचाकीस्वारांना हेल्मेट आणि चारचाकी वाहनचालकांना सीटबेल्ट सक्तीचे करण्यात येणार आहे. नवीन वर्षांपासून ही मोहीम राबविली जाणार आहे. महामार्गाने प्रवास करताना हेल्मेट किंवा सीटबेल्ट न लावणाऱ्या चालकांना वाहतूक पोलिस दोन तासांचे समूपदेशन करणार आहेत.

दुचाकी चालकाने हेल्मेट, चारचाकी चालकाने सीटबेल्टचा वापर करावा, यासाठी वाहतूक शाखेतर्फे दरवर्षी जनजागृती केली जाते. मात्र, अनेकजण त्याकडे दुर्लक्ष करीत वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत वाहने चालवितात. परिणामी त्यांना अपघाताच्या घटनांत जीव गमवावा लागतो. त्यामुळे पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनात नवीन वर्षांपासून विशेष मोहीम राबविली जाणार आहे. अपघाताच्या घटनांत मृत्यूचे प्रमाण कमी करणे, हा त्या मागील मुख्य उद्देश आहे.
- हृदयनारायण यादव, पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा, चंद्रपूर.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eighth Pay Commission Update: आठवा वेतन आयोगाबाबत महत्वाची अपडेट! कर्मचाऱ्यांना लवकरच ‘Good News’ कारण...

IND vs NZ 2nd T20I : भारतीय संघाने मोडला पाकिस्तानचा वर्ल्ड रेकॉर्ड! जगात २००+ धावांचा 'असा' पाठलाग करणारा जगातील पहिलाच संघ

Pune Election : रूपाली ठोंबरे यांच्यासह कार्यकर्त्यांवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Pune Crime : पुणे पोलिसांची कठोर कारवाई: वानवडीतील गुन्हेगार महेश शिंदेवर एमपीडीए अंतर्गत कारवाई

Investment Fraud : दुप्पट परताव्याचे आमिष दाखवून १५ कोटींची फसवणूक; पुण्यातील व्यापाऱ्याला अटक

SCROLL FOR NEXT