65 nomination form take back out of 66 in bhisi grampanchayat election 
विदर्भ

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज तर भरले, पण एका दिवसातच एक वगळता सर्वच अर्ज घेतले मागे

जितेंद्र सहारे

भिसी (जि. चंद्रपूर ) :  भिसी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची घोषणा 11 डिसेंबरला झाली. त्याच्या काही दिवसांनी नगरपंचायत करण्यात आल्याची पहिली घोषणा शासनाने केली. एकीकडे नगरपंचायतीकडे वाटचाल करणाऱ्या भिसीत ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम झाला. त्यामुळे निवडणूक लढवायची की नाही या संभ्रमात उमेदवार होते. रविवारी पार पडलेल्या एका बैठकीत 66 उमेदवारांनी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला. सोमवारी (ता. 4) 66 पैकी 65 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. 

मुदत संपुष्टात आलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम आयोगाने डिसेंबर महिन्यात जाहीर केला. चिमूर तालुक्‍यातील भिसी सर्वांत मोठी ग्रामपंचायत आहे. निवडणूक कार्यक्रम झाल्यानंतर प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज भरले. मात्र, त्यानंतर नगरपंचायतीची उद्‌घोषणा शासनाने केली. नगरपंचायतीची उद्‌घोषणा झाल्यानंतर निवडणूक लढवायची की नाही याबाबत उमेदवारांत संभ्रम होता. रविवारी येथील विठ्ठल-रुखमाई मंदिर सर्वपक्षीय बैठक पार पडली. याच बैठकीत ग्रामपंचायतीची निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला. 66 उमेदवारांनी अर्ज मागे घेण्याचा ठराव बैठकीत घेतला. 

सोमवारी (ता. 4) 66 उमेदवारांनी चिमूर तहसील कार्यालय गाठले. त्यापैकी 65 उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्ज परत केले. भिसी नगरपंचायतीची निर्मिती तातडीने करण्यासाठी भिसीवासींनी एकतेचे दर्शन दाखविले. उमेदवारी मागे घेतल्याचे निवेदन तहसीलदारांमार्फत प्रशासनाला पाठविण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

Anurag Thakur : जेव्हा देशाला गरज असते तेव्हा गांधी दांड्या मारतात; अनुराग ठाकूर यांची टीका

Beed Crime: बीडच्या परळीमध्ये धक्कादायक घटना! पोट फाडून पत्नीचा खून; नेमकं काय घडलं?

Mumbai News : आरक्षण वर्गीकरणाच्या न्या. बदर समितीला सहा महिन्याची मुदतवाढ

SCROLL FOR NEXT