election e sakal
विदर्भ

९ बाजार समित्यांच्या निवडणुकांचा बिगूल वाजला, सहकार विभागास तयारीचे आदेश

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : कोरोना संक्रमणामुळे मुदतवाढ देण्यात आलेल्या जिल्ह्यातील नऊ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांचा (amravati apmc election) बिगूल वाजला आहे. सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने जिल्हा उपनिबंधकांना बाजार समितीच्या निवडणुकांची तयारी करण्यास बजावले आहे. यामध्ये दोन्ही टप्प्यातील बाजार समित्यांचा समावेश आहे.

अमरावती जिल्ह्यात बारा बाजार समित्या असून त्यापैकी नऊ बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत संपली आहे. त्यांना कोरोना संक्रमणामुळे एक वर्ष मुदतवाढ देण्यात आली होती. शासनाला आता मुदतवाढ देणे शक्य नसल्याने या बाजार समितीच्या निवडणुका घेण्याचे आदेश सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने काढले आहेत.

23 ऑक्टोबरपासून निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नऊपैकी नांदगाव खंडेश्वर व धामणगावरेल्वे या बाजार समितीवर प्रशासक नियुक्त करण्यात आले आहे. तर सप्टेंबर 2021 मध्ये दर्यापूर, चांदूररेल्वे, अचलपूर व अंजनगावसुर्जी या चार बाजार समित्यांच्या संचालक मंडळाची मुदत संपली असून ऑक्टोबरमध्ये अमरावती, चांदूरबाजार व तिवसा या बाजार समितीची मुदत संपत आहे. या नऊही बाजार समित्यांच्या निवडणुकांचा बिगूल वाजला गेला आहे.

बाजार समित्यांना 23 ऑक्टोबर अंतिम मुदत -

सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाने सर्व बाजार समित्यांना 23 ऑक्टोबर 2021 ही अंतिम मुदत ठरवून निवडणूक प्रक्रियेस प्रारंभ करण्यास सांगितले आहे. तीन महिन्यांचा कालावधी या प्रक्रियेसाठी लागणार असल्याने नवीन संचालक मंडळ अस्तित्वात येईस्तोवर तीन महिने मुदतवाढ दिली आहे. 23 ऑक्टोबरपासून तीन महिने मुदतवाढीचा काळ राहणार आहे. यादरम्यान संचालक मंडळास कोणतेही धोरणात्मक निर्णय करता येणार नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : मोनोरेल बंद, मेट्रोतही तांत्रिक बिघाड; घाटकोपर रेल्वे स्थानकावर उसळली प्रवाशांची गर्दी

'त्या घटनेनंतर मी खूप रडलो होतो' अभिनेता राजकुमार राव स्पष्टच बोलला, म्हणाला, 'आम्हाला काय भावना नाहीत का?'

Latest Maharashtra News Updates : संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी सुरू, उज्ज्वल निकम कोर्टात हजर

Cyber Security : जगभरात चक्क १६ अब्ज पासवर्ड झाले लीक; भारत सरकारने दिला इशारा, तुमचं अकाऊंट सुरक्षित करा एका क्लिकवर..

Beed : कर्ज फेड नाहीतर पत्नीला माझ्या घरी सोड, सावकाराच्या जाचाने दुकानदाराची आत्महत्या; चिठ्ठीत लिहिलं, वर्गणी काढून क्रियाकर्म करा

SCROLL FOR NEXT