MSEB
MSEB SYSTEM
विदर्भ

अमरावती : सहा हजार शेतकरी झाले थकबाकीमुक्त

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : शेतकऱ्यांनी मार्च २०२२ पर्यंत त्यांच्याकडील वीजबिलाच्या थकबाकीपैकी ५० टक्के रक्कम भरल्यास थकीत वीजबिल १०० टक्के माफ होणाऱ्या महाकृषी योजनेचा शेतकऱ्यांना लाभ घ्यावा, असे आवाहन वीज कंपनीने केले आहे. अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील ५९६४ शेतकऱ्यांनी ९.४७ कोटी रुपयांचा भरणा करून वीजबिल थकबाकीमुक्त होण्याचा मान प्राप्त केला आहे.

कृषिपंपधारक शेतकऱ्यांना थकबाकीतून मोठा दिलासा देण्यासाठी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या पुढाकारातून महाकृषी ऊर्जा धोरण तयार करण्यात आले आहे. या धोरणात सहभागी होणाऱ्या कृषी ग्राहकांच्या मागील पाच वर्षांपर्यंतच्या म्हणजेच सप्टेंबर २०१५ पर्यंतच्या थकबाकीवरील विलंब आकार १०० टक्के माफ करण्यात येऊन सदर थकबाकीवर १८ टक्क्यांपर्यंत व्याज न आकारता वीज कंपनीने घेतलेल्या कर्जावरील सरासरी व्याजदराच्या अनुषंगाने व्याज आकारण्यात येऊन थकबाकी निश्चित करण्यात येत आहे.

त्यानुसार शेतकऱ्यांना सवलत देण्यात येत आहे. पाच वर्षांपूर्वीच्या थकबाकीवरील विलंब आकार व व्याज १०० टक्के माफ करण्यात येत असून केवळ मूळ थकबाकीच वसुलीसाठी ग्राह्य धरण्यात येत आहे. या योजनेत वसूल झालेल्या एकूण रकमेपैकी कृषी आकस्मिक निधीअंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर ३३ टक्के व जिल्हास्तरावर ३३ टक्के एवढी रक्कम विकासकामांसाठी मिळणार आहे. त्यामुळे थकबाकीमुक्तीतून १०० टक्के बाहेर पडण्यास मदत करणाऱ्या व गाव आणि महाकृषी धोरणाचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन वीज कंपनीने केले आहे.

यवतमाळातील दोन हजार शेतकऱ्यांचा सहभाग

यवतमाळ जिल्ह्यातील १ हजार ९२० कृषी ग्राहकांनीही त्यांच्याकडे असलेल्या एकूण ८ कोटी ४९ लाख रुपयांच्या थकबाकीपैकी ३ कोटी १५ लाख रुपये भरून महावितरण कृषी धोरणात थकबाकीमुक्तीची संधी साधली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने जिंकला टॉस; गुजरातच्या प्लेइंग-11 मध्ये मोठे बदल

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

Akshaya Tritiya 2024 : कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती 

SCROLL FOR NEXT