अमरावतीतून  निघणार लखीमपूर शेतकऱ्यांच्या अस्थिकलश यात्रा
अमरावतीतून निघणार लखीमपूर शेतकऱ्यांच्या अस्थिकलश यात्रा  sakal
विदर्भ

अमरावतीतून निघणार लखीमपूर शेतकऱ्यांच्या अस्थिकलश यात्रा

सकाळ वृत्तसेवा

अमरावतीतून निघणार लखीमपूर शेतकऱ्यांच्या अस्थिकलश यात्रा

अमरावती : संपूर्ण देशात खळबळ उडवून देणाऱ्या लखीमपूर येथील शेतकऱ्यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर त्यांच्या अस्थिकलश यात्रेला अमरावतीमधून सुरुवात होणार आहे.

लखीमपूर घटनेत शहीद झालेल्या शेतकऱ्यांचे अस्थिकलश घेऊन अस्थिकलश यात्रा ७ नोव्हेंबरला अमरावती शहरातून निघणार आहे. सकाळी ११ वाजता इर्विन चौकातून हिरवी झेंडी दाखवून या यात्रेला सुरुवात होईल. संयुक्त किसान मोर्चा, अ. भा. किसान संघर्ष समन्वय समिती, कामगार संघटना कृती समिती, जनआंदोलन संघर्ष समितीच्या संयुक्त विद्यमाने ही कलशयात्रा आयोजित करण्यात आली आहे.

यात्रेसंदर्भात माहिती देताना अशोक सोनारकर यांनी सांगितले, ७ व ८ नोव्हेंबरला जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर, चांदूररेल्वे, तिवसा, मोर्शी, या तालुक्यांत फिरून तिवसामार्गे ९ नोव्हेंबरला वर्धा जिल्ह्यात ही यात्रा प्रवेश करेल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने ही कलशयात्रा चंद्रपूर, भद्रावती, भंडारा, नागपूर, साकोली आदी ठिकाणी भ्रमण करेल. नागपूर येथे १८ नोव्हेंबरला बुटीबोरी येथून निघून संविधान चौकात जाहीर सभेच्या माध्यमातून या कलशयात्रेचा समारोप केला जाईल. समारोपीय कार्यक्रमाला किसान नेते अतुलकुमार अंजान मार्गदर्शन करतील.

कलश यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन डॉ. महेश कोपूलवार, अशोक सोनारकर, संजय मांडवधरे, अरुण बनकर, महेश देशमुख, तुकाराम भस्मे, विजय रोडगे, सुनील मेटकर, डॉ. डी. ए. पवार, चंद्रकांत बानुबाकोडे, सुभाष पांडे आदींनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi's Advice To Muslims: जगभरातला मुसलमान बदलतोय पण... मुस्लिम धर्मियांना पहिल्यांदाच PM मोदींनी का दिला सल्ला?

बापरे! बॉल समजून पकडला बॉम्ब ... 13 वर्षीय मुलाचा स्फोटात मृत्यू , नेमकं काय घडलं?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी एक वाजेपर्यंत देशात 39.92 टक्के मतदान; महाराष्ट्रात 31.55 टक्के मतदानाची नोंद

Satara Lok Sabha : उदयनराजेंनी आधी घड्याळाकडं पाहिलं अन् बरोबर 7 वाजून 7 मिनिटांनी केलं मतदान

Uber Fake Fare Scam : चालक दाखवतायत खोटं भाडं, ग्राहकांची होतेय लूट.. उबरने दिला सावधान राहण्याचा इशारा!

SCROLL FOR NEXT