Raju todsam Team eSakal
विदर्भ

यवतमाळमध्ये भाजपला खिंडार; माजी आमदार राजू तोडसम राष्ट्रवादीत

यवतमाळमध्ये राजकीय समीकरणं बदलण्याची चिन्ह दिसत आहेत.

राजकुमार भीतकर/विनोद कोपरकर

यवतमाळ: आर्णी विधानसभेचे भाजपचे माजी आमदार प्रा. राजु तोडसाम यांनी गुरुवार (ता.11) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुबंई येथे झालेल्या कार्यक्रमात प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीपुर्वी भाजप मध्ये जाणर्‍यांची संख्या जास्त होती. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणार्‍यांची संख्या वाढली आहे. जिल्ह्यातही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इनकमींग सुरु झाली आहे. बाबासाहेब गाडे पाटील यांच्या नंतर आता आर्णी विधानसभेचे भाजपचे माजी आमदार राजु तोडसाम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे. 2019 मध्ये भाजपने तोडसाम यांना उमेदवारी नाकारली होती.

राजु तोडसाम यांनी बंड करीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करीत निवडणुक लढविली होती. त्यामुळे त्यांना पक्षातून निष्काषीत करण्यात आले होते. आगामी काही दिवसात जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातल्या आहे. त्या पार्श्‍वभुमीवर तोडसाम यांचा झालेला पक्ष प्रवेक्ष महत्वाचा मानला जात आहे. आर्णी, पांढरकवडा तसेच घाटंजी या दोन तालुक्यात तोडसाम यांचा चांगला प्रभाव आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, तोडसाम यांच्या पक्षपवेक्षावेळी राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, आमदार इंद्रनील नाईक, माजी आमदार संदीप बाजोरीया, जिल्हाध्यक्ष क्रांती पाटील कामारकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Priyanka Gandhi Latest News : काँग्रेसने प्रियांका गांधींवर सोपवली महत्त्वाची जबाबदारी!, पाच राज्यांमधील 'स्क्रीनिंग कमिटी' केली स्थापन

India Vs Bangladesh cricket : भारत आता बांगलादेश सोबतही नाही खेळणार क्रिकेट?; हिंसाचाराच्या घटनांचे क्रिकेट विश्वात पडसाद!

Manoj Jarange:समाजापेक्षा कुणीच मोठे नाही: मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे; आंदोलनाची वेळ आल्यास सरकारचं अवघड होईल!

ShivrajSingh Chouhan: लाडकी बहीण योजना थांबणार नाही: केंद्रीयमंत्री शिवराजसिंह चौहान; विरोधी पक्षाकडून जाणीवपूर्वक अपप्रचार!

Solapur politics: साेलापुरात कार्यकर्त्यांचे अश्रू नजरेआड! ‘आत्यावरील अन्यायाने’ व्यथित, तीस वर्षांपासून एकनिष्ठ अर्ज माघारी अन्..

SCROLL FOR NEXT