library. 
विदर्भ

कोरोनामुळे पुस्तकेही कुलुपात, राज्यातील तब्बल बारा हजार ग्रंथालये बंदच

प्रदीप बहुरुपी

वरुड (अमरावती) : श्रीमान योगी, छावा, मृत्युंजय, ययाति, बारोमास, अशा हजारो ग्रंथांवर आता धूळ जमा झाली आहे. कोरोनाच्या महामारीत जीवनपथावरील मार्गदर्शक ग्रंथसंपदा आता कपाटातच लॉकडाउन असल्याचे दिसून येते. गेल्या दीड महिन्यापासून सार्वजनिक ग्रंथालयांची दारे बंद असून इथली पुस्तके मोकळा श्‍वास घेण्यास आसुसलेली असल्याचे दिसून येत आहे.
राज्यात सार्वजनिक ग्रंथालयांच्या माध्यमातून सुजाण नागरिक घडविण्याचे धोरण शासनाचे आहे. राज्यात 12,149 सार्वजनिक ग्रंथालये असून या ज्ञानमंदिरांमध्ये लाखोंची ग्रंथसंपदा आहे. एरवी पुस्तकांसाठी वाचक वेटिंगवर असल्याचे चित्र नेहमी पाहावयास मिळते, मात्र आज हीच पुस्तके ग्रंथालयात पडून आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्वत्र लॉकडाउन व संचारबंदी असल्याने राज्यातील सार्वजनिक ग्रंथालये बंद आहेत. गेल्या दीड महिन्यापासून पुस्तकांची देवाणघेवाण बंद असल्याने त्या पुस्तकांवरही आता धूळ जमा झाली आहे. एकीकडे लॉकडाउन व संचारबंदीत माणूस अडकला असला तरी विरंगुळा म्हणून या पुस्तकांची मोठी मदत या वेळी होऊ शकली असती. शिवाय त्यामुळे ज्ञानार्जनही झाले असते, परंतु कोरोनामुळे ही ग्रंथसंपदाही लॉकडाउन झाल्याचे दिसून येते. या परिस्थितीत समाजमन सुदृढ राहणे गरजेचे असल्याने समाजस्वास्थ्यासाठी बंद असलेली ग्रंथालये सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी होऊ लागली आहे. महाराष्ट्रातील सर्व सार्वजनिक ग्रंथालये सदैव सामाजिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्याचे कार्य करीत आली आहेत. वाचनाच्या माध्यमातून समाजाला ताजे ठेवणे आणि मन प्रफुल्लित ठेवण्याचा या वाचनालयांचा प्रयत्न आहे. अन्न, वस्त्र, निवारा या मनुष्याच्या प्राथमिक गरजा आहेत. त्यापैकी अन्न या घटकात बौद्धिक गरज भागविणारे अन्न म्हणून ग्रंथ व वाचनीय साहित्य ही समाजाची महत्त्वाची गरज आहे. या लॉकडाउन काळात सर्व सार्वजनिक ग्रंथालयांना दररोज किमान दोन तास ग्रंथांची देवाणघेवाण करण्याकरिता सोशल डिस्टन्सिंग पाळण्याच्या अटीवर परवानगी दिली तर आमचे सामाजिक कर्तव्य आम्ही नक्कीच पूर्ण करू, असे मत ग्रंथालय संचालकांनी व्यक्त केले.
वाचनाने विचार प्रगल्भ होतात

वाचनामुळे लोकांच्या मनावरील ताण नक्कीच कमी होतो आणि मन प्रफुल्लित होतं; विचार प्रगल्भ होतात. त्यामुळे मुख्यमंत्री व उच्च शिक्षणमंत्र्यांनी यावर विचार करून सार्वजनिक ग्रंथालये सुरू करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ नियामक मंडळाचे सदस्य चंद्रकांत चांगदे व महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघांचे कार्याध्यक्ष डॉ. रा. श. बालेकर यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Heritage status: शिवरायांच्या किल्ल्यांना 'युनेस्को'चा दर्जा मिळण्यास का लागतोय वेळ? गडांच्या व्यवस्थापनावर समितीने ठेवलं बोट

Mumbai News: जैन मंदिरावरील कारवाई योग्यच, उच्च न्यायालयाने ट्रस्टचे अपील फेटाळले

Thane News: ठाण्यात उभी राहणार ग्रीनवॉल! पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाचा निर्णय

Mumbai News: नागरिकांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका, वेसावे ते भाईंदर कोस्टल रोडच्या कामाला वेग

Latest Maharashtra News Live Updates: गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डी संस्थाचा मोठा निर्णय; मंदिर २४ तास भक्तांसाठी खुलं राहणार!

SCROLL FOR NEXT