ravikant tupkar.jpeg 
विदर्भ

Video:गारपिटीचा तडाखा; पीक पाहून शेतकरी ढसाढसा रडला

सागर कुटे

अकोला : आधीच आर्थिक अडचणींचा डोंगर कमी होईना, त्यातल्या त्यात ही नैसर्गिक आपत्ती सुचू देईना असली गत शेतकऱ्यांची झाली आहे. आता रब्बीकडून आशा असताना मंगळवारी (ता.17) दुपारनंतर वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाचे घास हिरावले आहे. या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी गेलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकरांसमोर पिकाची झालेली अवस्था पाहून शेतकऱ्याच्या अश्रूंचा बांध फुटला.


वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा, वाशीम या तीनही जिल्ह्यात मंगळवारी (ता.17) दुपारनंतर वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी जोरदार गारपीटही झाली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकरी या अवकाळीने कर्जाच्या खायीत लोटल्या गेला आहे. सोयाबीन व कापसाचा हंगाम पावसामुळे वाया गेला. आता रब्बीकडून आशा असताना या अवकाळीने गहू व मका पिकाचे नुकसान केले. 

महत्त्वाची बातमी - आता आठवडी बाजारही बंद!

संपूर्ण मका पीक उद्‍ध्वस्त
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी मोताळा (जि.बुलडाणा) तालुक्यातील जनुना, धामणगाव, कोथळी, परडा, शिरवा, डिडोळा, बोरखेड, तरोडा, जयपूर या भागात जावून नुकसानीची पाहणी केली. या ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे मका व गहू पिकांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले. यामध्ये जनुना येथील शेतकरी दीड एकरातील सुभाष पंढरीनाथ मानकर यांच्या शेतातील संपूर्ण मका पीक उद्‍ध्वस्त झाले. या शेतकऱ्याच्या शेतात शेतात रविकांत तुपकर हे पाहणीकरिता गेले असता शेतकरी मानकर यांचा तुपकरांसमोर अश्रूंचा बांध फुटला. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र
यावेळी तुपकरांनी शेतकऱ्यास धीर देत मदत मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले. तसेच शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याचे सांगितले. शेतकऱ्याची व्यथा ऐकून जिल्हाधिकारी यांच्याशी रविकांत तुपकरांनी फोन वरून चर्चा केली. तो व्हिडीओ त्यांना पाठवला. तसेच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन झालेल्या नुकसानीची गंभीरता लक्षात आणून दिली. सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठविले.

अन्यथा आंदोलनाचे हत्यार
सरकारचे काम हे आपत्तीच्या काळात मदत करणे आहे. दर दोन-तीन वर्षांनी अशी नैसर्गिक आपत्ती येत असते. याकरिता सरकारने शेतकऱ्यांसाठी फंड राखून ठेवला पाहिजे. इतर उद्योगांना कर्ज माफ होतात. सबसिडीच्या स्वरुपात मदत करतात. शेतकरी जेव्हा नैसर्गिक आपत्तीमुळे कोलमडल्या जातो, तेव्हा मात्र सरकार त्यांना मदत करायला धजावत नाही. शेतकरी जगला तरच समाजातला घटक टिकू शकतो.  या आपत्तीच्या काळात सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी अन्यथा आंदोलनाचे हत्यार उगारण्यात येईल.
रविकांत तुपकर, नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

J&K Bus Accident : जम्मू-काश्मीरमध्ये खोल दरीत बस कोसळली; 4 जवान ठार, ३१ जखमी

Mukesh Ambani यांनी खरेदी केलं १००० हून अधिक कोटीचं विमान; देशात असं Jet कोणाकडेच नाही; काय आहे खास?

Mumbai News: भर रस्त्यात महिलेला प्रसूतीकळा; ताडपत्री अन् बॅनरच्या मदतीने पोलिसांनी साधलं प्रसंगावधान

Yashasvi Jaiswal ने सुनील गावसकरांचा विक्रम मोडला, सर डॉन ब्रॅडमन यांच्या पंगतीत जाऊन बसला

Mumbai Senate Election: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित; सुप्रिया सुळेंची सडकून टीका

SCROLL FOR NEXT