Chandrapur News
Chandrapur News esakal
विदर्भ

Chandrapur News: अंत्ययात्रेला आलेल्या ५० जणांवर मधमाशांचा हल्ला; ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू

रुपेश नामदास

सिंदेवाही: मृतदेह सरणावर ठेवत असतानाच मधमाशांनी हल्ला केला. यात स्माशानात जमलेले वीस ते पंचेवीस जण जखमी झाले. ही घटना शनिवारी (ता. ६) येथे घडली. जखमींना तातडीने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.यात जवळपास ५० नागरिक जखमी झाल्याची माहिती आहे.

येथील महाकाली नगरी परिसरात राहणारे राजू मार्तंडवार हे कर्करोगाने ग्रस्त होते. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू होते.शुक्रवारी त्यांचे निधन झाले.

अंत्यविधि शनिवारी होता. त्यामुळे त्यांचे सर्व नातेवाईक, परिसरातील नागरिक जमले होते. प्रेतयात्रा दुपारच्या वेळेस स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कारकरिता नेण्यात आली. स्मशानभूमीत सरण रचले. त्यानंतर विधी सुरू झाला.

प्रेताला अग्नी द्यायची बाकी असताना मधमाशांनी हल्ला केला. त्यामुळे स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी जमलेले नातेवाईक, नागरिकांची धावपळ सुरू झाली. काही नातेवाईकांवर मधमाशांनी हल्ला केल्याने ते जखमी झालेत.

मधमाशांचे काटे अंगाला ,मांडीला ,हाताला , मानेला चावा घेऊन रुतलेले होते. मधमाशांनी भरपूर जणांना चावा घेतला. त्यामुळे सरनावरचे रचलेले प्रेत तसेच ठेवलेले होते. सर्वांनी मिळेल तिथे आसरा घेतला. या हल्ल्यात जखमी झालेल्याना ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता हलविण्यात आले आहे.

ग्रामीण रुग्मालयात नगराध्यक्ष कावळे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी भेट दिली. या हल्ल्यात चंदू श्रीकुंडवार, प्रदीप अटकापूरवार हे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार चार वाजता करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salary Hike: आनंदाची बातमी! यावर्षी कर्मचाऱ्यांची होणार 12 टक्क्यांपर्यंत पगारवाढ; अहवालात माहिती उघड

Revoting: दोन गटांतील हाणामारीत 'ईव्हीएम'ची तोडफोड, 'या' राज्यात फेरमतदानाला सुरूवात

Latest Marathi News Live Update: ठाकरे गटाचे उमेदवार आज दाखल करणार अर्ज

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

World Hunger : काही देशांच्या युद्धामुळे जगभरात वाढले उपासमारीचे संकट; काय आहे परिस्थिती?

SCROLL FOR NEXT