विदर्भ

गावठी राजकारणामुळे धरणाशेजारील गावांमध्ये भीषण पाणीबाणी

ऋषिकेश हिरास

दिग्रस (जि. यवतमाळ) : दिग्रस-आर्णी मार्गावर शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर अरुणावती प्रकल्प उभारला गेला खरा. त्यातून दिग्रस तालुका आणि वाशीम जिल्ह्यातील २८ गावांना पाणीपुरवठा सुरूही झाला. दिग्रसची तहानही हाच प्रकल्प भागवायला लागला. परंतु, अरुणावती धरणापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या अनेक गावांची ‘कोरड’ मात्र या धरणाला थांबवता आली नाही. घशातील ही कोरड ओठांवरही आली. अनेकदा निवेदनं दिली गेली. मात्र, त्याकडे जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने जसे सोईस्कर दुर्लक्ष केले. तसेच लोकप्रतिनिधी आणि सरकारनेही. (Due-to-the-village-politics,-there-is-a-water-crisis-in-the-village-near-the-dam)

सावंगा (बु) हे गाव धरणापासून केवळ तीन किमी अंतरावर आहे. साखरा आणि आरंभी हे तर त्याहीपेक्षा नजीक. परंतु, या तिन्ही गावांमधील कोरड तीव्र झाली आहे. ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’ हे दुर्दैव शब्दशः अनेक गावांच्या वाट्याला आले आहे. अनेक गावांत जलकुंभ उभारले गेले. नळ लावले गेले. परंतु, टाकीतच नाही तर नळात कुठून येणार? अनेक गावांमध्ये केवळ टाकीचे खांब तेवढे उभे झाले आहे. ‘काम सुरू आहे’, ही रट वर्षानुवर्षे लावली जात आहे. भ्रष्ट अधिकाऱ्यांनी ही योजना पार लंबी करून टाकली. यासाठी गावागावांतील गटातटाचे गावठी राजकारणही कारणीभूत आहे.

अरुणावती धरणापासून केवळ तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या सावंगा (बु.) येथील ग्रामस्थ पाण्याविना सैरभैर आहेत. २०१४ मध्ये जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडे ही समस्या मांडण्यात आली. या गावासाठी ग्रामपंचायतीकडून पाण्याची टाकी मंजूर करण्यात आली. मात्र, गेल्या वर्षीपासून गावात केवळ पाण्याच्या टाकीचे खांब तेवढे उभे आहेत. सात वर्षे उलटूनही या प्रस्तावाकडे जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने लक्ष दिले नाही. त्यामुळे गावकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

१९८४ मध्ये सावंगा बुद्रुक गावाचे पुनर्वसन झाले. त्यावेळी गावाची लोकसंख्या साडेसहाशे होती. तत्कालीन प्रशासनाने गावाच्या मूलभूत सुविधेअंतर्गत पंधरा वर्षांचे नियोजन आखून गावाला पाणीपुरवठा होईल, अशी व्यवस्था केली. सध्या गावाची लोकसंख्या चार हजारांवर आहे. परंतु त्या तुलनेत पाणीपुरवठा होत नाही. याबाबत ग्रामपंचायतीमार्फत अनेकदा वरिष्ठ विभागाकडे पत्रव्यवहार करण्यात आला; परंतु याकडे कुणी लक्ष दिले नाही. अखेर २०१४ पासून गावकऱ्यांनी संबंधित विभागाला लेखी पत्र देऊन मागण्यांकडे लक्ष वेधले; परंतु ग्रामविकास मंत्रालय ते स्थानिक पंचायत समिती प्रशासनापर्यंत सर्वत्र पत्रव्यवहार करून, ठराव घेऊन, प्रस्ताव देऊन काहीही झाले नाही.

प्रत्येकानेच झटकली जबाबदारी

२०१४ मध्ये आमदार संजय राठोड यांना निवेदन देऊन पाणीटंचाईची समस्या सांगितली. त्यावर आमदार राठोड यांनी जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाला निर्देश देऊन गावाचा राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाअंतर्गत नवीन कृती आराखड्यात समावेश करण्याचे निर्देश दिले. यावर जिल्हा परिषद यवतमाळ पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी सदर गाव शंभर टक्के हागणदारीमुक्त व स्वच्छ भारत मिशनच्या वेबसाईटवर समाविष्ट असणे आवश्यक आहे, असे अर्जदाराला कळवून जबाबदारी झटकली. जिल्हा परिषद प्रशासनाने सावंगा (बु.) येथील पाणी प्रश्नाबाबत सकारात्मक भूमिका घेतली नाही. समस्येवर कोणताही तोडगा काढलेला नाही. परिणामी गावकऱ्यांना खाजगी टॅंकरने पाण्याची व्यवस्था करावी लागते. परंतु ते सर्वांना परवडणारे नाही.

गावाचे पुनर्वसन झाले तेव्हाची साडेसहाशेची लोकसंख्या आता चार हजारांवर पोहोचली आहे. परंतु पाणी पुरवठा योजनेत त्यानुसार विस्तार झालेला नाही. परिणामी गावात तीव्र पाणीटंचाई जाणवते. याबाबत विविध विभागांकडे २०१४ पासून लेखी मागणी केली; परंतु जिल्हा परिषद, यवतमाळ पाणीपुरवठा विभागाकडून सकारात्मक पाऊल उचलण्यात आलेले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे. पाण्यासारख्या मूलभूत व अत्यावश्यक गरजेकडे शासनाने त्वरित लक्ष देऊन येथील प्रश्न सोडवावे.
- राजेश गुरगुडे, माजी ग्रामपंचायत सदस्य, सावंगा (बु.)
अरुणावती धरणाच्या बुडीत क्षेत्रातील विहिरीतून नव्या पाण्याच्या टाकीसाठी पाइपलाइन टाकलेली आहे. त्यामुळे या टाकीचे काम लवकर झाल्यास गावाची पाणीपुरवठ्याची समस्या निकाली निघेल. काही दिवसांपूर्वी माजी उपसरपंचांच्या भेटीदरम्यान कंत्राटदाराने येत्या आठ दिवसांत काम सुरू करणार असल्याचे सांगितले. काम सुरू न झाल्यास आम्ही यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे नवीन कंत्राटदार द्यावा किंवा काम लवकर निकाली काढण्याबाबत पत्रव्यवहार करू.
- रविकांत निकम, सरपंच, सावंगा (बु.)
पस्तीस वर्षांपूर्वी सावंगा (बु) गावाचे पुनर्वसन झाले. तत्कालीन पाणीपुरवठा नियोजन आणि आजचा पाण्याचा वापर यात कमालीचे अंतर आहे. पिण्याची समस्या दिवसेंदिवस बिकट होत आहे. ‘धरण उशाला अन् कोरड घशाला’ अशी गावची परिस्थिती आहे. नवीन सरपंचांसह सर्वच सदस्यांनी मिळून पाणी समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा.
- संतोष झाडे, ग्रामनिवासी, सावंगा (बु.)

(Due-to-the-village-politics,-there-is-a-water-crisis-in-the-village-near-the-dam)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Exit Poll 2024: 'हा तर सरकारी एक्झिट पोल...', निकालांचा कल हाती आल्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : एक्झिट पोलमध्ये देशात तिसऱ्यांदा NDA ची सत्ता; INDIA आघाडीला किती जागा मिळणार?

Loksabha election 2024 Exit Poll : एकच पठ्ठ्या म्हणतोय मोदी चारशेपार होतील! तेही घटकपक्षांना धरुन; काय आहे एक्झिट पोलची आकडेवारी?

Mumbai News : महिला प्रवाशांची रेल्वेला साथ; सुट्टी किंवा वर्क फ्रॉम होममुळे महिला डब्यात तुरळक गर्दी

OpenAI Robotics Comeback : लवकरच तुमच्या भेटीला येतोय 'AI रोबोट' ; प्रगत तंत्रज्ञान घेऊन OpenAIचं पुन्हा पदार्पण

SCROLL FOR NEXT