Escalated family strife in Corona crisis 
विदर्भ

कोरोनामुळे वाढले कौटुंबिक कलह, उघडकीस आल्या संतापजनक घटना; वाचा हा स्पेशल रिपोर्ट

सूरज पाटील

यवतमाळ : कोरोनामुळे मानवी जीवन पूर्णत: बदलले आहे. प्रत्येकाच्या जीवनात ताणतणाव निर्माण झाला आहे. जगण्याची परिभाषा बदलली असून, आजच्या खाण्या-पिण्याची सोय होईल का, आपण जगू का, अशीच चिंता प्रत्येकाला आहे. देश हळूहळू अनलॉक होत असताना धोकाही प्रचंड वाढला आहे. नागरिक घराबाहेर पडल्याने सामूहिक संसर्गाची भीती व्यक्‍त होत आहे. लॉकडाऊनच्या काळात घरात बंदिस्त झाल्याने अनेकांचे मानसिक संतुलन बिघडल्याने चिडचिड वाढली आहे. एवढेच नव्हे तर नात्यांमधील गोडवा हरवत चालला आहे.

20 ते 35 वयोगट असलेल्या तरुण पिढीच्या आयुष्यातील शिक्षण, व्यवसाय, नोकरी अशा सर्वव्यापी दुखण्यावर कोरोनाचे आक्रमण झाले. अनेकांना रोजगार व नोकरी गमवावी लागली. आगामी काळात हे संकट अधिक गंभीर होणार असल्याचे सांगितले जाते. गावातही हाताला कामे नसल्याने बसून-बसून चिंतेच्या सावटात ताणतणाव वाढला आहे. कधी नव्हे तो कुटुंबातील सदस्यांना एकत्र राहण्यासाठी वेळ मिळाला. मात्र, त्यात आपुलकीचा ओलावा कमी आणि वादविवाद अधिक असेच चित्र बघावयास मिळत आहे. हातावर पोट असणाऱ्यांची व्यथा सुन्न करणारी आहे.

यवतमाळपासून ते दुर्गम भागात क्षुल्लक कारणातून रक्ताच्या नात्याला संपविण्यात आल्याच्या घटना नुकत्याच उघडकीस आल्या. महागाव तालुक्‍यात वडिलांनी मोबाईल फोडल्याच्या संतापातून विधीसंघर्षग्रस्त मुलाने जन्मदात्याचा खून केला. केळापूर तालुक्‍यात पती-पत्नीच्या वादात पित्याने चिमुकल्या मुलीला जमिनीवर आदळून संपविले. घाटंजी तालुक्‍यात मुलीला विहिरीत फेकून वडिलाने आत्महत्या केली.

यवतमाळ शहरात आईच्या चारित्र्यावर वडील संशय घेत असल्याच्या रागात मुलाने चक्‍क वडिलांनाच संपविले. नेर तालुक्‍यात विधीसंघर्षग्रस्त बालकाने वडिलाचा खून केल्याची घटना अगदी ताजीच आहे. या सर्वच घटना घरात बंदिस्त जीवन जगत असताना घडल्या आहेत. मन अस्वस्थ असताना चिंतेच्या काहुरातून घडलेल्या घटना समाजमनाला चिंतन करायला भाग पाडते.

क्षुल्लक कारणातून पवित्र नात्याला संपविण्यात आल्याच्या घटनाही बऱ्याच ठिकाणी चर्चिल्या जात आहेत. मात्र अनेक कौटुंबिक वादाच्या घटना चार भिंतीच्या आड मुक्‍या झाल्या आहेत. कोरोनाचे संकट आज नाही तर उद्या निघून जाईल. त्याची प्रत्येकाला प्रतीक्षा आहे. तोपर्यंत मानसिक स्वास्थ टिकावे, यासाठी सरकारस्तरावरून अधिक जनजागृती होणे आवश्‍यक आहे.

घराघरांत रोजगाराची चिंता

कोरोनाला हरविण्यासाठी लॉकडाऊन सुरू झाल्याने अर्थव्यवस्था रसातळाला गेली. आता अनलॉक होत असताना अनेकांच्या व्यवसाय व नोकऱ्यांवर गंडांतर आले. काही दिवस शांत गेल्यावर पुन्हा पोटाची चिंता सतावू लागली. जुना व्यवसाय ठप्प झाल्याने काहींनी नवीन रोजगाराचा मार्ग निवडला. याच काळात सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या आत्महत्येत वाढ झाली. वर्तमान सोडून भविष्यातील रोजगाराची चिंता आता घराघरांत सतावत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav 2025: मोफत बस गणेशभक्तांसाठी की मतांसाठी? राजकीय स्पर्धा पेटली, राजकारण्यांमध्ये चढाओढ

Mumbai News: मुंबई पोलिसांची हद्द आता कोकणापर्यंत! पोलिस ठाणे उभे राहणार, कधी आणि कुठे? वाचा...

CM Devendra Fadnavis: राज्यातील ३,५०० गावे ‘इंटेलिजंट’ करणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; नागपुरातील सातनवरी येथे पहिला प्रयोग

Manoj Jarange-Patil: मराठा आरक्षण मिळवल्याशिवाय परतणार नाही: मनोज जरांगे-पाटील; प्रश्न निकाली न लागल्यास इतिहास घडवणार

Nikki Bhati Murder Case : महिलेबरोबर फिरताना पकडला गेला होता विपीन भाटी, तेव्हा....; निक्की हत्याकांड प्रकरणात मोठा खुलासा!

SCROLL FOR NEXT