Farmer leader Rakesh Tikait will take rally in Yavatmal on 20  
विदर्भ

शेतकरी नेते राजेश टिकैत केंद्र सरकारविरोधात रणशिंग फुंकणार; यवतमाळात होणार जाहीर सभा

राजकुमार भितकर

यवतमाळ : केन्द्र सरकारने कृषी क्षेत्राशी संबंधीत पारीत केलेल्या तिन कायद्याविरोधात देशभर प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. हे कायदे व्यापारी धार्जीने असून त्यामुळे शेतक-यांची प्रचंड लुट होणार आहे. दरम्यान हे तुघलकी कृषी कायदे परत घेण्यासाठी तसेच केन्द्र सरकारविरुध्द बिगुल फुंकण्यासाठी यवतमाळात शेतकरी नेते राजेश टिकैत यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आल्याची माहिती सिकंदर शहा यांनी दिली आहे. दिनांक 20 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता स्थानिक आझाद मैदानात ही सभा होणार आहे. 

या कृषी कायद्यांमुळे किमान आधारभूत किंमतीचे संरक्षण संपुष्टात येण्याची शक्यता असल्याने शेतकरी वर्ग संभ्रमात सापडला आहे. या नविन कायद्यांच्या माध्यमातून शेतीचे व्यापारीकरण करण्यात आले आहे. करार शेतीमुळे गरीब, हतबल शेतकरी आनखी गुलाम झाल्याशिवाय राहणार नाही. केन्द्र सरकारचे कायदे येण्यापुर्वीच मोठमोठे वेअर हाऊस बांधणे सुरु झाले आहे. शेतक-यांसोबत शेतीचा करार करायचा, चांगले उत्पन्न घ्यायचे आणि शेतक-यांची मात्र कमी भावात बोळवण करायची असा गोरखधंदा सुरु होणार आहे. 

व्यापारी हे व्यापार करण्यात हुशार असतात त्यामुळे त्यांचेकडून शेतक-यांबद्दल आत्मीयतेची भावना जागृत होण्याची अपेक्षा करणे चुकीचे आहे. या व्यापारीकरणात शेतक-यांचा शेतीव्यवसाय संपुष्टात येईल. हक्काचे व्यासपीठ असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्या सुध्दा संपुष्टात येतील. त्यामुळे व्यापा-यांची एकाधिकारशाही सुरु होईल अशी भिती सिकंदर शहा यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान केन्द्र सरकारने हे काळे कायदे परत घ्यावे यासाठी दिल्ली येथे गेल्या दोन महिण्यापासून शेतक-यांचे आंदोलन सुरु आहे. आता हे आंदोलन देशभरात सुरु करण्यासाठी रणनिती आखण्यात आली आहे. 

त्याअनुषंगाने यवतमाळ येथे आझाद मैदानात दिनांक 20 फेब्रुवारीला शेतकरी नेते राजेश टिकैत यांची जाहिर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेची जय्यत तयारी सुरु करण्यात आली आहे. यासंदर्भात नियोजन करण्यासाठी कालच जिल्हयातील शेतकरी नेत्यांची बैठक पार पडली.

केन्द्र सरकारने पारीत केलेल्या काळया कृषी कायद्याविरोधात दिल्ली सिमेवर शेतक-यांचे आंदोलन सुरु आहे. आता हेच आंदोलन देशभर पेटविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. या आंदोलनाची सुरुवात यवतमाळातून होत आहे. यवतमाळात सभा व्हावी यासाठी राजेश टिकैत यांनी होकार दिला असून जिल्हाभरातील शेतकरी तसेच नागरीकांनी या सभेला उपस्थित राहणे गरजेचे आहे.  
सिकंदर शहा
अध्यक्ष, शेतकरी वारकरी संघटना 

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India WPI Inflation : देशात महागाईचा स्फोट! सामान्यांच्या खिशाला बसणार फटका, रोजच्या खर्चात होणार वाढ

Deepti Sharma: गेल्या वर्षी वर्ल्ड कप जिंकवला, अन् आता पाकिस्तानलाही नडली! भारताच्या 'या' लेकीने ऐतिहासिक विजयानंतर नेमकं काय म्हटलं?

Madhuri Elephant Return Kolhapur : 'माधुरी' हत्तीण महिन्याभरात कोल्हापूरला येणार!, वनताराची टीम नांदणीत पुनर्वसन केंदाच्या पाहणीसाठी दाखल

Latest Marathi News Live Update : पद्मसिंह पाटील कोर्टात दाखल

Whatsapp मध्ये मोठं अपडेट! आता विना मोबाईल करता येणार व्हिडिओ अन् ग्रुप वॉइस कॉल; पण कसं? पाहा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT