delhi agitation e sakal
विदर्भ

घरावर काळे झेंडे लावून केंद्र सरकारचा निषेध, दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा

भाग्यश्री राऊत

अमरावती : गेल्या सहा महिन्यांपासून राजधानी दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन (farmers agitation delhi) सुरू आहे. केंद्र सरकारने केलेले तीन कृषी कायदे (central government agriculture act) रद्द करण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र, अद्यापही ही मागणी पूर्ण झाली नाही. त्यामुळे आंदोलन सुरूच आहे. याच आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार (chandurbazar amravati) येथील वळी या गावामध्ये घरांवर काळे झेंडे लावून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. (farmers agitation against central government to oppose agriculture act in amravati)

केंद्र सरकारने लागू केलेले तीन कृषिविरोधी कायदे रद्द व्हावे यासाठी मागच्या सहा महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. २६ मे रोजी मोदी सरकारला ७ वर्ष पूर्ण होत आहेत. शेतकरी विरोधी कायदे करणाऱ्या मोदी सरकारचा निषेध म्हणून २६ मे रोजी प्रत्येकाने आपल्या घरावर काळा झेंडा लावावा, असे आवाहन राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केले होते. त्यानुसार प्रहारच्या कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी आज हे आंदोलन केले आहे. घरावर काळे झेंडे लावत मोदी सरकारविरोधा निषेध व्यक्त केला आहे. कोरोनामुळे लोक बेरोजगार झाले आहेत. तसेच शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही. त्यात सरकारने हे काळे कायदे आणले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवले पुलाजवळ भीषण अपघात; ब्रेक फेल झालेल्या कंटेनरची वाहनांना धडक, दोघांचा मृत्यू

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण १७ वर्षे रखडले; खर्चात तब्बल ५५०० कोटींची वाढ, कोकणवासीयांचा संताप उफाळला

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT