farmers are not getting enough Urea in Yavatmal  
विदर्भ

कास्तकारांनो जीवावर उदार होऊ नका! शेतकऱ्यांची वाढली डोकेदुखी.. पण काय आहे कारण..वाचा  

चेतन देशमुख

यवतमाळ : यंदा जुलै महिन्यापासूनच जिल्ह्यात युरियाचा तुटवडा मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. युरिया खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. युरिया मिळत नसल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात 57 हजार मेट्रिक टन खत येणे आवश्‍यक होते. प्रत्यक्षात आतापर्यंत केवळ 40 हजार मेट्रिक टन जिल्ह्याला प्राप्त झाले असून 17 हजार टनाचा तुटवडा आहे.

जिल्ह्यात यंदा नऊ लाखांहून अधिक हेक्‍टरवर खरीप हंगामाची लागवड झाली आहे. त्यासाठी बी-बियाणे, खते, कीटकनाशक आदींचे नियोजन कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आले होते. असे असले तरी सुरूवातीला सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा मोठ्या प्रमाणात निर्माण झाला होता. सोयाबीनचा निर्माण झालेला तुटवडा कृत्रीमरित्या कृषी केंद्रचालकांनी केल्याची बाब उघडकीस आली होती. 

अशात शेतकऱ्यांनी मिळेल त्या कंपनीच्या बियाण्यांची लागवड केली. मात्र, सोयाबीनचे बियाणे उगवलेच नाही. या संदर्भात जिल्ह्यात तब्बल 12 हजारांवर तक्रारी दाखल झाल्या आहेत. अशा परिस्थितीला तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांना आता युरियाची अडचण भेडसावत आहे. सध्या जिल्ह्यात युरियाचा तुटवडा निर्माण झाला आहे. 

आतापर्यंत जिल्ह्याला 40 हजार मेट्रिक टन युरिया उपलब्ध झाला आहे. जेव्हा की या महिन्याअखेरपर्यंत जिल्ह्याला 57 हजार 870 मेट्रिक टन खत येणे अपेक्षित होते. आवंटनाच्या तुलनेत तब्बल 17 हजार मेट्रिक टन खत अप्राप्त असल्याने शेतकऱ्यांना खतासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. खरीप हंगामासाठी यंदा जिल्ह्याची मागणी 63 हजार 200 मेट्रिक टनाची आहे. मात्र, सप्टेंबर अखेरपर्यंत नियोजित आवंटन येण्याची शक्‍यता कमीच आहे. 

शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली

सध्या पिकांना युरियाची गरज आहे. यासाठी शेतकऱ्यांकडून मागणीत वाढ झाली आहे. मात्र, त्या तुलनेत आवक खूपच कमी आहे. एप्रिल, मे व जून महिन्यात लॉकडाउन असल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. त्याचा परिणाम रॅक पाईन्टवर झाला. खत मिळत नसल्याने सुरुवातीला शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खतांची साठवणूक केली. मात्र, ही केवळ मोजक्‍या शेतकऱ्यांनाच शक्‍य झाले. इतर शेतकरी अजूनही खतांच्या प्रतीक्षेत आहेत. खत मिळत नसल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. अनेक अडचणी असताना आता युरियाची अडचण आल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे.

महिन्याभरात 50 टक्के युरिया

जिल्ह्यात युरियाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशा परिस्थितीत आवक कमी होती. त्यामुळे खताचा प्रश्‍न गुंतागुंतीचा होण्याची शक्‍यता होती. आतापर्यंत जिल्ह्यात 40 हजार मेट्रिक टन युरिया आला आहे. यातील जवळपास 25 हजार मेट्रिक टन युरिया हा 10 जुलै ते आजपर्यंत आला आहे. सध्या तूट 17 हजार मेट्रिक टनाची आहे. एव्हढी मोठी तूट भरून काढणे आताच शक्‍य दिसत नाही. या आठवड्यात आणखी रॅक लागण्याची शक्‍यता आहे. मात्र, यातील किती खत जिल्ह्याच्या वाट्याला येणार, यावरच शेतकऱ्यांचे नियोजन अवलंबून आहे.

कृषिमंत्र्यांच्या आश्‍वासनाची आठवण

महिन्याभऱ्यापूर्वी कृषिमंत्री दादा भुसे यवतमाळ जिल्ह्यात आले होते. यावेळी जिल्ह्यातील कृषीविषयक बाबींचा आढावा घेताना युरियाचा तुटवडा निर्माण झाल्याची माहिती त्यांना मिळाली. दरम्यान, कृषिमंत्री भुसे यांनी ही तूट भरून काढण्यात येईल, असे आश्वासन दिले. सध्या युरिया येण्याचे प्रमाण वाढले असले तरी तूट भरून निघालेली नाही. त्यामुळे त्यांचे आश्वासन कधी पूर्ण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


संपादन - अथर्व महांकाळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jarandeshwar Factory: 'जरंडेश्वर कारखान्याची ऊस वाहतूक रोखली'; दराबाबत ‘स्वाभिमानी’चे कार्यकर्ते आक्रमक

Wedding Muhurat: लग्नाची तारीख ठरवायची आहे? मग जाणून घ्या तुळशी विवाहानंतरचे शुभ लग्नमुहूर्त एका क्लिकमध्ये!

Latest Marathi News Live Update : सुषमा अंधारे डॉक्टर निर्भया यांच्या गावात दाखल; टाकीवर गावकऱ्यांचे आंदोलन सुरू

Sindhudurg Tragedy : Video करून तरूणाने घेतला गळफास, पत्नी नातेवाईकांच्या हाती लागलेल्या व्हिडिओत धक्कादायक बाबी समोर

Madhya Pradesh : आता मध्य प्रदेशातील सर्व शासकीय भरतींसाठी एकसमान परीक्षा प्रणाली लागू होणार, CM यादव यांची घोषणा

SCROLL FOR NEXT