farmers does not come in APMC for selling grains in amravati
farmers does not come in APMC for selling grains in amravati 
विदर्भ

अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी का फिरकला नाही?

क्रिष्णा लोखंडे

अमरावती : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापारी व खरेदीदार उभे आहेत. दररोज भाव उघडतात. मात्र, आवकच नाही. पोते भरून माल घेऊन येण्याची वेळ झाली तरी शेतकरी अजूनही बाजार समितीकडे फिरकला नाही. खरिपातील मूग आणि उडीद पिकांचा हंगाम आहे. मात्र, या पिकांची आवकच नाही. 

खरीप हंगामातील पहिले पीक मूग व उडीद यावेळी बाजारात विक्रीला येते. बाजार गरम असतो व शेतकऱ्यांच्या खिशात पहिल्या पिकाचे पैसे पडू लागतात. यंदा पाऊस लवकर आला. शेतकऱ्यांनी पेरणी आटोपली. त्यानंतर उत्पादन बऱ्यापैकी होईल, असा शेतकऱ्यांचा अंदाज मात्र फोल ठरला. ऑगस्टमधील संततधार पावसाने मूग व उडदाची धूळधान केली. सरासरी घसरली. मुगाचे उत्पादन सरासरी हेक्‍टरी 25 किलोपर्यंत आले. उडदाचीही तीच गत झाली. अमरावती जिल्ह्यात 15 हजार हेक्‍टर क्षेत्रात मूग, तर पाच हजार हेक्‍टर क्षेत्रात उडदाची पेरणी होती. तिची सरासरी आली नाही. पोते भरून शेतकरी बाजार समितीत विक्रीसाठी येण्याची वेळ झाली तरी तो आलाच नाही.

व्यापारी व खरेदीदारांनी खरेदी-विक्रीसाठी ओटे सजविले. शासनाने परिस्थिती बघून शासकीय खरेदीसाठी तयारी केली. नोंदणी केंद्र सुरू केले. मात्र, दोन्ही दरबारात मूग व उडीद घेऊन शेतकरी फिरकला नाही. गेल्या पंधरा दिवसांपासून अमरावती बाजार समितीत दोन्ही पिकांचे भाव उघडल्या जात आहेत. खरेदी मात्र शून्य आहे. नाही म्हणायला उडदाची थोडीफार आवक झाली. मुगाची प्रतीक्षा मात्र अजूनही कायम आहे. शासकीय नोंदणी सुरू झाली आहे. मात्र, त्याठिकाणी देखील एकाही शेतकऱ्याने नोंदणी केलेली नाही. यंदा दोन्ही पीक मिळणार नाही, अशी स्थिती आहे.

संपादन - भाग्यश्री राऊत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: 'डायल 108' अ‍ॅम्ब्युलन्स प्रोजेक्ट कंत्राट प्रकरण तापणार? हायकोर्टाकडून राज्य सरकारला नोटीस

Pat Cummins: कमिन्सनं सांगितलं कसं तुटलेलं त्याचं बोट... ऐकून हार्दिक अन् सूर्याही झाले शॉक; Video व्हायरल

Latest Marathi News Live Update : 'तीन टप्प्यांनंतर हे स्पष्ट झालंय की भाजपचा विजय रथ जनता पुढे नेतेय..' - पंतप्रधान मोदी

Wedding Season : नोंदणी पद्धतीने विवाह करायचा आहे? मग, जाणून घ्या सोपी प्रक्रिया

18 आमदारांची प्रतिष्ठा लागली पणाला; नेत्यांच्या कामगिरीवरच लोकसभेच्या उमेदवारांचं भवितव्य अवलंबून!

SCROLL FOR NEXT