farmers went to delhi from amravati to support farmers agitation  
विदर्भ

काळे विधेयक रद्द केल्याशिवाय परतणार नाही, दिल्लीकडे निघालेल्या शेतकऱ्यांचा निर्धार

प्रशिक मकेश्वर

तिवसा (जि. अमरावती ) : गेल्या एक महिन्यापेक्षाही अधिक काळापासून दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेचे हजारो कार्यकर्ते आणि शेतकरी दिल्लीला निघाले आहेत. अनेक शेतकरी हे रात्रीपासूनच तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी असलेल्या गुरुकुंज मोझरीमध्ये मुक्कामाला होते. आज सकाळी तुकडोजी महाराजांचे दर्शन घेऊन हे हजारो कार्यकर्ते नागपूर आणि तेथून दिल्लीच्या दिशेने रवाना झाले. तत्पूर्वी त्यांनी मोझरी व तिवसा येथे सभा घेत काळे विधेयक रद्द केल्याशिवाय मागे हटणार नाही, असा निर्धार शेतकऱ्यांनी यावेळी बोलताना केला.

केंद्र सरकारने नव्याने लागू केलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात मागील एक महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून दिल्लीच्या सीमेवर पंजाब, हरियाणातील लाखो शेतकरी आंदोलन करीत आहेत. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातील अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने हजारो कार्यकर्ते आणि शेतकरी हे दिल्लीच्या दिशेने रवाना झाले आहेत.

राज्यातील कोल्हापूर, नाशिक अहमदनगर यासह अन्य काही जिल्ह्यातून निघालेले हजारो कार्यकर्ते आज मोझरीत दाखल झाले होते. मोझरी व तिवसा येथे त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले तर त्यानंतर त्यांनी सभा घेत आपली भूमिका स्पष्ट करत केंद्र सरकारवर निशाना साधला यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्ष राज्य सचिव तुकाराम भस्मे,सुभाष लांडे,नामदेव गवाडे, राजन शिरसागर, नामदेव चव्हाण, राम बाहेती, विजय रोडगे, लक्ष्मण धाकडे,अशोक सोनारकर,प्रकाश सोनोने,सागर दुर्योधन, चंद्रकांत वडस्कर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT