Farmers will have to return the sanman fund 
विदर्भ

सरकार परत घेणार शेतकऱ्यांचा ‘सन्मान’; तुमचा तर यात समावेश नाही ना

नीलेश डोये

नागपूर : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना चार महिन्यांत दोन हजार रुपये देण्यात येते. यासाठी केंद्र सरकारकडून काही निकष निश्चित करण्यात आले होते. या निकषात मोडत नसलेल्यांनीही अर्ज भरून लाभ घेतला. ही बाब सरकारच्या लक्षात आल्याने आता अशा अपात्र शेतकऱ्यांकडून दिलेला निधी परत घेण्यात येणार आहे.

ऑनलाईन नोंदणी करताना काही शेतकऱ्यांनी खोटी माहिती भरली. यात नागपूर जिल्ह्याचा विचार केल्यास करदाते शेतकरी व इतर असे जवळपास पाच हजारांवर शेतकऱ्यांना हा निधी परत करावा लागणार आहे. शेतकऱ्यांकडून ही रक्कम वसूल करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

शेतकरी सन्मान निधीसाठी जी पात्रता देण्यात आली आहे; त्यात सर्वात प्रमुख अट हीच होती की ते करदाते नसावेत. तरीही करदात्या शेतकऱ्यांनीही याचा लाभ घेतल्याचे सांगितले जाते. दोन हजार प्रती महिन्याप्रमाणे चार महिन्यांच्या अंतराने तीन समान हप्त्यात जिल्ह्यातील एक लाख आठ हजार शेतकऱ्यांना पैसे देण्यात आलेले आहेत.

अपात्रेची कारणे

या योजनेच्या लाभासाठी काही निकष आहेत. त्यानुसार शेतकरी करदाता, खासदार, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, सदस्य, डॉक्टर, वकील व सीए नसावा. या अटींचे पालन न केलेले तसेच मृत आदी अपात्रतेची कारणे आहेत.

अपात्र शेतकऱ्यांची यादी
अपात्र शेतकऱ्यांची यादी असून, त्यांना निधी परत करण्यासाठी माहिती देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी निधी परत न केल्यास संबंधित बॅंकेला पत्र पाठवून निधी कपात करून शासन जमा करण्यात येईल.
- रवींद्र खजांजी,
निवासी उपजिल्हाधिकारी, नागपूर

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant Warning : जर कुणी कोर्टाशी पंगा घेतला तर ... सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश सूर्यकांत कोणावर भडकले ?

Chitali Murder: चितळीत माजी सैनिकाचा निर्घृण खून; माण तालुक्याकील धक्कादायक घटना, तीन संशयित ताब्यात; नेमकं काय घडलं!

T20 World Cup: 'झिम्बाब्वेकडून ICC स्पर्धेत हरणं म्हणजे...', ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाहेर गेल्यावर रिकी पाँटिंग काय म्हणाला?

Honey Benefits : मध समज, गैरसमज

Uttar Pradesh Education : शाळांमध्ये धडकणार सरकारी पथकं! योगी सरकारचा मोठा प्लॅन; विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी घेतला 'हा' मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT