corona .jpg
corona .jpg 
विदर्भ

नाशिक वरून पायी चालत आले अन् ते चार जण या शहरात झाले क्वारंटाईन

पंजाबराव ठाकरे

संग्रामपूर (जि.बुलडाणा) : नाशिकवरून अकोट तालुक्यात जाणाऱ्या चार लोकांना 23 एप्रिल रोजी सोनाळा पोलिसांनी ताब्यात घेतले. याबाबत संग्रामपूर तहसीलदार यांना माहिती दिल्यावर त्या चारही जणांना 24 एप्रिल रोजी बावनबीर येथील शाळेत क्वारंटाईन करण्यात आले आहे. 

कोरोना विषाणू संकट काळात संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउन सुरू आहे. यामध्ये कुणीही जिल्हा बाहेर जाऊ नये म्हणून पोलिस प्रशासनाकडून आंतर जिल्हा चेक पोस्ट लावण्यात आले आहे. संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा पोलिस स्टेशनकडून सगोडा फाट्यावर अकोला जिल्ह्यात जाणाऱ्या रस्त्यावर चेक पोस्ट लावले आहे. 23 एप्रिलचे दुपारी याच चेक पोस्टवर जीवनावश्यक वस्तूचे वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी थांबविले.

सदर वाहन क्रमांक एम. एच. ३० बीडी 2438 मध्ये गव्हाचे कट्टे होते. हे वाहन गहू घेऊन अकोटकडे जात होते. त्या गव्हाच्या कट्ट्यावर चार व्यक्ती कर्तव्यावर असलेले पोलिस कर्मचाऱ्यांना चेकिंग दरम्यान बसलेले दिसून आले. त्यामध्ये किशोर दहीकर (वय 27, रा. धोडाकर ता. तेल्हारा), राजेंद्र टोटे (वय 18, रा. चिंचपाणी ता अकोट), कैलास टोटे (वय 18, रा. चिंचपाणी ता अकोट), विलास टोटे (वय 22, रा. चिंचपाणी ता. अकोट) यांचा समावेश आहे. या चारही जणांना पोलिसांनी विचारपूस केली. 

नाशिक येथे करतात मजुरी काम
त्यामध्ये सर्व जण नाशिक येथे मजुरी काम करतात. लॉकडाउनचे काळात ते नाशिक वरून पायी चालत आले. सोनाळा गावा नजीक त्यांना हे वाहन भेटले. या वाहनातून अकोटला ते जात होते. त्यांचे जवळ एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्याकरिता आवश्यक कोणताही परवाना नव्हता. म्हणून सोनाळा पोलिस स्टेशनचे ठाणेदार अमर चोरे यांनी या व्यक्तींची माहिती तहसीलदार आणि वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांना पत्राद्वारे दिली. त्यावरून चारही जणांना क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

एकूण सात लोकांना क्वारंटाईन
चार व्यक्ती अकोला जिल्ह्यात जाताना सगोडा पोलिस चेक पोस्टवर पोलिसांना दिसून आले. त्यांची माहिती मिळताच 24 एप्रिल रोजी त्यांना बावनबीर येथील शाळेत क्वारंटाईन करण्यात आले आहे. या ठिकाणी एकूण सात लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यामध्ये बावनबीर येथील पती-पत्नी व कळमखेड येथील एक जण आणि हे चार असे सात लोकांचा समावेश आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी तालुका स्तरावर प्रशासन काळजी घेऊन आहे.
- समाधान राठोड, तहसीलदार, संग्रामपूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT