gang thefting Goats in Wardha district  
विदर्भ

सावधान! वर्ध्यात बकरी चोरांची नवी गॅग; आतापर्यंत केल्या घरफोड्या, लांबविल्या दुचाकी

रुपेश खैरी

वर्धा : शहरात बकरी चोरांची नवी गॅंग सक्रिय झाली आहे. या गॅंगमध्ये आतापर्यंत घरफोड्या आणि दुचाकी लांबविणाऱ्या चोरट्यांचा समावेश आहे. पहिल्याच चोरीत ही टोळी पोलिसांच्या हाती असून तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून चोरीतील बकऱ्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत. ही कारवाई रामनगर पोलिसांकडून करण्यात आली आहे.

विशाल चंदू कुराडे, आकाश विलास शिंदे आणि त्यांना सहकार्य करणारा विजय राजू मुळे सर्व रा. वडार झोपडपट्टी असे अटकेतील आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. पिपरी (मेघे) येथील हलुमान मंदिर परिसरातील निखिल राऊत यांच्या मालकीच्या 50 हजार रुपये किमतीच्या चार बकऱ्या लांबविल्याची तक्रार रामनगर पोलिसात करण्यात आली. 

या चोरीचा तपास सुरू असताना विशाल कुराडे आणि आकाश शिंदे हे दोघे दुचाकीवर बकऱ्या घेऊन गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून या दोघांना पोलिसांनी कॉमर्स कॉलेजजवळ ताब्यात घेतले. त्यांच्याजवळून चारही बकऱ्या जप्त करण्यात आल्या. या कारवाईत एकूण 1 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अटक करण्यात आलेल्या चोरट्यांनी पहिल्यांदाच बकऱ्या लांबविल्याचे तपासात पुढे आले. अटकेत असलेल्या या तिघांनी यापूर्वी घरफोडी दुचाकी चोरी आणि इतर चोऱ्या केल्याच्या नोंदी पोलिसात असल्याचे सांगण्यात आले. ही करवाई ठाणेदार धनाजी जळक यांच्या निदोशानुसार पोलिस उपनिरीक्षक पुंडलिक गावडे, पंकज भरणे, लोमेश गाडवे, अजय अनंतवार, अजित सोर, संदीप खरात यांनी केली.

संपादन - अथर्व महांकाळ 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

'आलमट्टी'ची उंची वाढविल्यास सांगली-कोल्हापूरला धोका नाही, महाराष्ट्र सरकार विनाकारण गोंधळ करून घेतंय; आमदाराचं मोठं विधान

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

SCROLL FOR NEXT