सेवाग्राम : झाडांना पाणी देताना वनरक्षक धनराज मजरे.  
विदर्भ

सुखदवार्ता :  वनरक्षकाचे वृक्षप्रेम, स्वखर्चाने जगविली झाडे 

रविराज घुमे

सेवाग्राम (वर्धा) : काही वर्षांपासून आपल्याकडे वृक्षारोपणाचे मोठे फॅड आले आहे. पण वृक्षांचे संगोपन करण्याविषयी कायम अंधारच असतो. या वृत्तीला छेद देत वृक्षसंवर्धनाचे वेड लागलेल्या एका वनरक्षकाने तब्बल तीन हजार झाडे शासनाची मदत न घेता स्वखर्चाने जगविली आहे. सेवाग्राम बिटामधील मदनी शिवारातील ही सुखदवार्ता आहे. हा वनरक्षक झाडांना पाणी देण्यासह त्यांची सर्व प्रकारे निगा राखतो. त्याच्या निःस्वार्थ सेवेने ही सर्व झाडे बहरली आहेत. 

झाडे पाण्याअभावी उन्हाळ्यात वाळली 

शासनाने विविध योजनांतर्गत वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार वृक्षारोपण झाले. पण, संवर्धनाबाबत मात्र कोणतीच योजना अंमलात आली नाही. परिणामी, अनेक ठिकाणी लावलेली झाडे जागीच वाळली. मदनी (दिंदोडा) येथे वनविभागाच्या जमिनीवर 2017-18 मध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले. या वृक्षारोपणात लावण्यात आलेली झाडे पाण्याअभावी उन्हाळ्यात वाळू लागली. पाणी नसल्याने अनेक झाडे मृतप्राय झाली. याची खंत मनात असल्याने या बिटात रुजू होताच वनरक्षक धनराज मजरे यांनी ही झाडे जगविण्याचा निश्‍चय केला. यावेळी शासनाच्या निधीचा आणि देणगीचा विचार न करता स्वखर्चाने पाणी देत ही झाडे जगविण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांना यश आले आहे. 

चिंच, खैर, आवळा आदी झाडांचा समावेश 

वनविभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या या रोपवनात सागवान, कडुनिंब, सीताफळ, चिंच, खैर, आवळा आदी झाडांचा समावेश आहे. या कामाला रोपवन मजूर सुनील वानखेडे आणि नामदेव बागडे यांचे सहकार्य मिळाले. या कार्याबद्दल वर्ध्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एस. बनसोड, श्री. शिरापूरकर यांनी वनरक्षक धनराज मजरे, रोपवन मजूर सुनील वानखेडे, नामदेव बागडे यांचे अभिनंदन केले आहे. 

रिकाम्या बाटल्या आणल्या विकत

 या झाडांना पाणी देण्याकरिता वनरक्षक धनराज मजरे यांनी काही क्‍लृप्त्या अंमलात आणल्या. यात त्यांनी बाजारातून प्लॅस्टिकच्या रिकाम्या बाटल्या विकत आणल्या. तब्बल तीन हजार बाटल्या कापून त्या झाडाखाली गाडल्या. या बाटल्यात ते दररोज पाणी भरतात. यामुळे येथे झाडांना पाण्याची कमतरता जाणवत नसल्याचे श्री. मजरे यांनी सांगितले. 

पाण्याचे नियोजन 

वनविभागाने मदनी येथील रोपवनाच्या 12 हेक्‍टर क्षेत्रामध्ये विविध प्रजातींच्या रोपांची लागवड केली. रोपवन करून त्यांची निगा राखण्याकडे मात्र दुर्लक्ष झाले. या झाडांना पाणी देण्याची कुठलीही व्यवस्था वनविभागाकडून करण्यात आली नाही. त्यामुळे झाडांना पाणी द्यायचे कसे, असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला. यातूनच शेतातील वेस्टेज पाणी या झाडांना मिळेल, असे नियोजन केले. येथील एका खड्ड्यात हे पाणी साचल्यानंतर ते या झाडांना देण्यात येत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T Raja Singh Resignation : ‘’आजच्याच दिवशी बरोबर ११ वर्षांपूर्वी मी...’’ ; भाजपने राजीनामा मंजूर करताच टी.राजा भावनिक!

Pune: सूपमध्ये झुरळ सापडले; पण तक्रारीकडे हॉटेल व्यवस्थापनाचे दुर्लक्ष, नंतर महिलेनं...; पुण्यातील खळबळजनक घटना

IND vs ENG 3rd Test: KL Rahul ने झेल सोडला! शुभमन गिल अम्पायरसोबत भांडला; Umpire ने मागे ढकलले अन् म्हणाले, जा...

Hinjewadi Electric Supply : हिंजवडीतील वीजपुरवठा ७२ तासांनी पूर्वपदावर; नागरिकांकडून सुटकेचा निःश्वास

World Record Internet Speed: इंटरनेट स्पीडचा वर्ल्ड रेकॉर्ड! 10,000 पेक्षा जास्त 4K सिनेमे एका क्षणात झाले डाउनलोड, कुठे घडला हा चमत्कार?

SCROLL FOR NEXT