Government fails to buy cotton, right time to provide free electricity.  
विदर्भ

महाराष्ट्र क्रिटिकल फेजमध्ये, कमी चाचण्यांची नीती अयोग्य, वाचा काय सांगतात माजी मुख्यमंत्री

सकाळवृत्तसेवा

अमरावती : कोरोना संक्रमितांची संख्या दररोज वाढत असल्याने महाराष्ट्र क्रिटिकल फेजमध्ये आहे. दिल्लीच्या तुलनेत महाराष्ट्राने चाचणीचे प्रमाण स्थिर करून ठेवलेले आहे. सरकारची कमी चाचण्यांची नीती योग्य नाही, अशी टीका विधान सभेचे विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी केली.

कोरोना विषाणू संक्रमणाचा विभागीय आढावा अधिकाऱ्यांकडून घेतल्यानंतर बोलावलेल्या पत्रपरिषदेत ते बोलत होते. देश आणि राज्य अनलॉक-टूमध्ये जाणार आहे. मात्र, काय करावे आणि काय करू नये, याबाबत सरकारमध्येच संभ्रम आहे, असे सांगत कापूस खरेदीच्या प्रश्‍नावर राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. केंद्राने पैसा देऊनही विहित आणि वाढीव मुदतीत सरकार कापूस खरेदी करू शकलेले नाही. बोगस बियाण्यांसंदर्भात संबंधितांवर कारवाई आणि बियाणे कायद्यानुसार अपेक्षित उत्पादनासाठी हमीभावानुसार बियाणे कंपन्यांकडून शेतकऱ्यांना भरपाई मिळवून दिली पाहिजे.

लॉकडाऊनमध्ये विद्युत वापराचे वाचन न घेण्याचा भुर्दंड जनतेला दिला जात आहे. केंद्राने महावितरणला हजार कोटींचे कर्ज दिलेले आहे. आता जनतेला विद्युत देयकातून सूट दिली पाहिजे. ऊर्जामंत्र्यांच्या घोषणेनुसार शंभर युनिटपर्यंत वीज मोफत देण्याची योग्य वेळ आलेली आहे. विद्युत देयकाचे हप्ते पाडून दिले तर लोक देयक अदा करू शकणार आहेत, असे फडणवीस यांनी सांगितले.

इंधनवर राज्यात व्हॅटद्वारे करावर कर आकारला जात असल्याने दरवाढ झालेली आहे. राज्य सरकारने अर्थसंकल्पात एक रुपया आणि आता दोन रुपये दरवाढ केली, त्यामुळे इंधन दरवाढी विरोधातील कॉंग्रेसचे आंदोलन बेगडी आहे, अशीही टीका फडणवीस यांनी केली. शेतकरी कर्जमाफी अद्याप मिळालेली नाही. बॅंकांशी करारनामे करण्याचे प्रमाण फारच कमी आहे. करारनामे करण्यात बॅंकांच्या अडचणी आहे. गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचे भाजपने समर्थन केलेले नाही, परंतु त्याचे सत्ताधाऱ्यांकडून राजकारण केले जात आहे, असेही यावेळी फडणवीस म्हणाले.

विदर्भ-मराठवाड्यासाठी आवाज उठवावा

वैधानिक विकास मंडळामुळे मागास विदर्भ-मराठवाड्याला निधी मिळून काही प्रमाणात विकास झाला. या मंडळांना पुन्हा मुदतवाढ देण्यासाठी भाजपने मुख्यमंत्र्यांना पत्र दिले. परंतु, एका नेत्याच्या भूमिकेने हा मुद्दा मंत्रिमंडळ बैठकीतून बाजूला ठेवण्यात आला. विदर्भ-मराठवाड्यातील सर्व मंत्र्यांनी यासाठी आवाज उठविला पाहिजे, असे फडणवीस म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palghar News: पालघरचा चेहरा-मोहरा बदलणार! ३०० एकरवर वन उद्यान उभारणार; पालकमंत्र्यांनी प्लॅनच सांगितला

Crime: आरजेडीला मत का नाही दिले? आधी वाद घातला, नंतर वृद्धाला क्रूरपणे संपवलं, घटनेनं खळबळ

Jalgaon News : जळगाव महापालिकेत 'भाजप विरुद्ध सर्व'! भाजप वगळता सर्वांशी युती, महाविकास आघाडीचा निवडणुकीसाठी मोठा निर्णय

Jalgaon Cyber Fraud : एकाने गमावले ४.६१ लाख तर, दुसऱ्याने ५.३५ लाख! जळगावात ऑनलाइन फसवणुकीचे वाढते प्रकार

IND A vs SA A: रिषभ पंतच्या टीम इंडियाविरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा दणदणीत विजय, तब्बल ४१७ धावांचं लक्ष्य गाठून मालिकेत बरोबरी

SCROLL FOR NEXT