Government forgets the sacrifice of martyr Devidas Tayde 
विदर्भ

शहिदाचा सरकारला विसर; ५६ वर्षांनंतरही शहीद शासनाच्या लेखी विस्मृतीत

चेतन देशमुख

यवतमाळ : देशासाठी शहीद झालेल्या जवानांवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होतात. ‘भारत माता की जय’ अशा घोषणा देत शहिदाला अखेरचा निरोप दिला जातो. मात्र, अनेकदा त्यांचं साधं स्मारकही उभारलं जात नाही. अशीच काहीशी स्थिती १९६५ मध्ये झालेल्या भारत-पाक युद्धात काश्‍मीरच्या सीमेवर शहीद झालेल्या देवीदास तायडे यांची आहे. ५६ वर्षांनंतरही जिल्ह्यातील पहिले शहीद शासनाच्या लेखी विस्मृतीत गेले आहे.

दारव्हा तालुक्‍यातील बोरी (अरब) येथील देवीदास सेवकदास तायडे यांचा जन्म ९ सप्टेंबर १९३५ रोजी झाला. वयाच्या १९ व्या वर्षी ९ सप्टेंबर १९५३ रोजी सैन्यात दाखल झाले. मध्यप्रदेशातील सागर येथील महार रेजीमेंटमध्ये त्यांची नियुक्ती झाली. सैनिकी शिस्तीत वाढलेल्या देवीदास यांच्या नसानसांत देशभक्ती ओतप्रोत भरली होती. त्याच काळात भारत-पाक युद्धाचे ढग जमू लागले.

१९६५ साली झालेल्या भारत-पाक युद्धात काश्‍मीर सीमेवर १२ सप्टेंबरला त्यांना वीरगती आली. ते यवतमाळ जिल्ह्यातील पहिले शहीद होते. आज त्यांना वीरगती प्राप्त होऊन ५६ वर्षांचा काळ उलटला. मात्र, अजूनही या वीर जवानाचे साधे स्मारकही उभारले नाही. त्यांनी गुजरात, गोवा, राजस्थान, लद्दाख, काश्‍मीर या ठिकाणी आपली सेवा दिली.

युद्धात देवीदास यांना वीरमरण आल्याची माहिती अंजनाबाईंना मिळताच त्यांच्यावर आभाळच कोसळले. मोठा मुलगा विजय तीन वर्षांचा तर लहाना संजय अवघ्या सहा महिन्यांचा होता. अशा कठीण प्रसंगी अंजनाबाईने दोन मुलांचा सांभाळ करून त्यांना उच्चशिक्षित केले.

नागरिकांनाही पडला विसर

जिल्ह्यातील पहिले शहीद हे बोरी (अरब) येथील आहेत. असे असतानाही अनेकांना याची माहिती नाही. तालुकास्तरावरही कुठेही ठळकपणे याची नोंद घेतली गेली नाही. त्यामुळे नागरिकांनाही या महान वीरपुरुषाचा विसर पडला आहे. वयाच्या तिशीत देशासाठी प्राण देणाऱ्या या शहिदाच्या स्मृती जागवायल्या हव्यात, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंढरपूर तालुक्यात खळबळ! 'दहा लाखांची खंडणी घेताना कामगार नेता रंगेहाथ जाळ्‍यात'; बदनामी थांबविण्यासाठी पैशाची मागणी

India US Trade: करार अंतिम करण्यासाठी प्रयत्न; भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत सचिव राजेश अग्रवाल यांची माहिती

PMPML Bus : ‘पीएमपी’ उत्पन्नात दरवाढीनंतर वाढ; उत्पन्न अडीच कोटींच्या उंबरठ्यावर

बीडमध्ये चाललंय काय? जमिनीच्या वादातून माजी सरपंचाची दहशत; रक्तबंबाळ होईपर्यंत तरुणाला बेदम मारहाण, पोलिसांवर राजकीय दबाव?

Latest Marathi News Updates : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची राज्य परिवहनच्या मुद्द्यावर सखोल चर्चा झाली

SCROLL FOR NEXT