file photo
file photo 
विदर्भ

सायबर पोलिस स्टेशनअभावी तक्रारींचा ढीग

अनिल कांबळे

नागपूर : शहरात तांत्रिक प्रणालीद्वारे होणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असून तपास करण्यासाठी सायबर क्राइम विभागात पुरेसे मनुष्यबळ नाही. सायबर गुन्हेगारांचे प्राबल्य वाढत असून हायटेक गुन्ह्यांमध्ये अचानक वाढ झाली आहे. यानिमित्त प्रस्तावित सायबर पोलिस स्टेशन केव्हा होईल? असा प्रश्‍न पोलिस विभागासह तक्रारकर्ते नागपूरकरांनाही पडला आहे.
गुन्हे शाखेच्या अंतर्गत सिव्हिल लाइन्समध्ये सायबर क्राइम विभाग कार्यरत आहे. पोलिस निरीक्षकांचीही नियुक्‍ती नसलेल्या सायबर क्राइममध्ये अपुरे मनुष्यबळ आहे. शहरातील पोलिस ठाण्यांची संख्या वाढत आहे. ठाण्यातील जवळपास 80 टक्‍के तक्रारींमध्ये सायबर क्राइम गुन्ह्याचा वापर आहे. गुन्ह्यांचा तपास आणि उकल करण्यासाठी सायबर क्राइमची भूमिका महत्त्वाची आहे. गुन्हेगारी कटामध्ये सामील आरोपींचे मोबाईल संभाषण, लोकेशन आणि फोटो-व्हिडिओ याबाबत तपास करायचा असल्यास सायबर क्राइम तपासात मदत करते. पुरावा जुळवाजुळव करण्यासाठी सायबर क्राइमचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे शहरात सायबर पोलिस स्टेशन होणे गरजेचे आहे. सध्या सायबर क्राइममध्ये तीन सहायक पोलिस निरीक्षक आणि 22 पोलिस कर्मचारी असा केवळ 25 जणांचा स्टाफ आहे. त्यापैकी 3 ते 4 कर्मचारी दीर्घ रजेवर आहेत. त्यामुळे संपूर्ण शहरातील तपासाचा भार मूठभर कर्मचाऱ्यांवर येत असल्यामुळे दिवसेंदिवस कामाचा ताण वाढत चालला आहे. परिणामी याप्रकरणी आलेल्या तक्रारींचा उलगडा होत नसून ढिगारा वाढत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha : पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा ; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार,भाजपचा दावा

Apple Bug : अ‍ॅपलच्या यूजर्सना भेडसावतेय वेगळीच समस्या; रिसेट करावा लागतोय Apple ID पासवर्ड

लग्नाच्या दिवशी नवऱ्या मुलाने केली मोठी चूक; नवरीमुलीने थेट लग्न मोडलं

Viral Video: शिक्षिकेची गुंडागर्दी! शेजारच्या घरात घुसून गोंधळ, लहान मुलासह तीन जखमी.. व्हिडिओ व्हायरल

International Labour Day : राजीनाम्यानंतर नोटीस कालावधी पूर्ण करणे बंधनकारक आहे का? काय सांगतो नियम

SCROLL FOR NEXT