सोनखास - गावात घरांवर व गल्लीत साचलेला गारांचा खच.
सोनखास - गावात घरांवर व गल्लीत साचलेला गारांचा खच. 
विदर्भ

गारपिटीने गहू आडवा

सकाळवृत्तसेवा

२० जनावरांचा मृत्यू - चंद्रपुरात अवकाळीचा फटका

यवतमाळ/चंद्रपूर - अवकाळीत वादळवाऱ्यासह झालेल्या गारपिटीत तीन हजार हेक्‍टर क्षेत्रावरील रब्बी पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नैसर्गिक आपत्तीत शेतकरी पुरता गारद झाला. नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे.

शेतात उभ्या असलेल्या गहू व हरभरा पिकांकडे बघून शेतकरी समाधान व्यक्त करीत होता. मात्र, गुरुवारी (ता. १६) सायंकाळी वादळवाऱ्यासह आलेल्या गारपिटीने हिरव्यागार स्वप्नांवर पाणी फेरले. शुक्रवारी (ता.१७) सकाळपासून कृषी सहायक व तलाठ्यांनी शेतशिवारात जाऊन नुकसानाच्या पंचनाम्याला सुरुवात केली. घाटंजी तालुक्‍यात सर्वाधिक गहू, हरभरा पिकांचे जवळपास २,२०० हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले. त्यापाठोपाठ नेर, दारव्हा, झरी, कळंब, दिग्रस, उमरखेड, दारव्हा आदी तालुक्‍यांत गहू, हरभरा, आंबा, संत्रा, भाजीपाला पिकांचे नुकसान झाल्याची माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली.

नैसर्गिक आपत्तीत २० जनावरांचा मृत्यू झाला. घाटंजी तालुक्‍यातील वाढोणा, सोनखास येथील १५ जनावरांचा समावेश असून, ८५० घरांची पडझड झाली आहे. वणी तालुक्‍यात १३ घरांचे नुकसान झाले. 

चंद्रपूर - गुरुवारी जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला. वादळवाऱ्यासह आलेल्या पावसाने रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले. घराची भिंत पडल्याने सात जनावरे मृत्युमुखी पडली. घरावरील टिनपत्रे उडाली. हातचे रब्बी पीक गेल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Exclusive: ठाकरे गटाकडून होणाऱ्या वैयक्तिक टीकेवर पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले, 'माझ्या कौटुंबिक स्थितीचीही थट्टा, पण..'

High Temperature : कोलकातामध्ये पन्नास वर्षातल्या सर्वोच्च तापमानाची नोंद; हवामान खात्याने दिली माहिती

Latest Marathi News Live Update: शिवरायांचं 'ते' वाघनखं महाराष्ट्रात येणं लांबलं

Rinku Singh T20 WC 24 : मिठाई, फटाके अन् सेलिब्रेशन, रिंकूचा फोन आला अन्... वडिलांनी सांगितलं त्या दिवशी काय घडलं

Jitendra Awhad : गुजरातच्या भरभराटासाठी महाराष्ट्राचा गळा घोटला जातोय; जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

SCROLL FOR NEXT