Rain 
विदर्भ

अवकाळीमुळे १० कोटींचे नुकसान! पिकांच्या हानीचा अहवाल आयुक्तांना सादर; आता भरपाई...

सकाळ वृत्तसेवा

अकोला : जिल्ह्यात एप्रिल महिन्यात अखेरच्या आठवड्यात अवकाळी पाऊस व गारपीट झाली. त्यामुळे ५ हजार ८८५ हेक्टर क्षेत्रातील पिकांनी हानी झाली असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी १० कोटी २६ लाखाची आवश्यकता आहे.

याबाबतचा संयुक्त (महसूल, कृषी व ग्राम विकास विभाग) अंतिम अहवाल विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आला आहे. त्यामुळे आता पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या खरीप हंगामापूर्वी ही नुकसान भरपाई मिळाल्यास शेतकऱ्यांना मशागत व पेरणीसाठी मदत होईल.

जून ते सप्टेंबर या दरम्यान पावसामुळे पिकांची हानी झाली होती. अनेक ठिकाणची शेती जमीन खरडून गेली. त्यानंतर परतीच्या पावासानेही पिकांचे नुकसान झाले. परिणामी खरीप हंगामातील शेतमालाचे उत्पादन प्रचंड प्रमाणात घटले. त्यामुळे खरीपमधील नुकसान रब्बी हंगामात भरून काढू, असा निर्धार करत शेतकरी पुन्हा कामाला लागला. मात्र रब्बी हंगामातही अतिवृष्टी व गारपीटमुळे पिकांची नासाडी झाली.

दरम्यान २६ व २७ एप्रिल राेजी भर उन्हाळ्यात अवकाळी पाऊस व गारपीट झाली होती. नुकसानग्रस्त क्षेत्राचे अंतिम संयुक्त (कृषी, महसूल व ग्रामविकास) पंचनामे पूर्ण झाले आहेत. या अहवालावर जिल्हाधिकारी, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांची स्वाक्षरी आहे.

येथे बसला होता फटका

तालुका नुकसान (हेक्टर) बाधित शेतकरी

बार्शीटाकळी १०८४.६ २३३५

मूर्तिजापूर ४५.८५ ११९

अकाेट ३५४.७७ ५९५

बाळापूर ३६१.३३ १३९५

पातूर ४०३९.०५ ६७४२

एकूण ५८८५.६० १११८६

असे झाले क्षेत्रनिहाय नुकसान

- जिल्ह्यात ५ हजार ४१६.९३ हेक्टर क्षेत्रावरील बागायती पिकांचे नुकसान झाले. याचा फटका २४४ गावातील १० हजार ३ शेतकऱ्यांना बसला. नुकसान भरपाईसाठी ९२ लाख ८७ हजाराची आवश्यकता आहे.

- जिल्ह्यात ४६८.६७ हेक्टर क्षेत्रावरील फळबांगाचे नुकसान झाले. ही हानी १०० गावातील १ हजार १८३ शेतकऱ्यांची झाली असून, नुकसान भरपाईसाठी १० काेटी ५४ लाखाची आवश्यकता आहे.

यंदा अवकाळीने झोडपले

यंदा उन्हाळ्याच्या प्रारंभीच अवकाळी पावसाने हजेरी लावली हाेती. तेल्हारा तालुक्यात ६ ते ७ मार्च राेजी २८६ शेतकऱ्यांच्या २०८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांची हानी झाली हाेती. बार्शीटाकळी, तेल्हारा व पातूर तालुक्यात १५ ते १९ मार्च दरम्यान ६३५ शेतकऱ्यांचे २ हजार ३८५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले हाेते. बार्शीटाकळी व पातूर तालुक्यात ३१ मार्च राेजी ६३५ शेतकऱ्यांचे ४३० हेक्टर क्षेत्रावरील पीकं जमीनदाेस्त झाली हाेती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT