man is more in yavatmal due to lightning strikes
man is more in yavatmal due to lightning strikes  
विदर्भ

आयता येथे वीज कोसळल्याने युवकाचा मृत्यू; सोयाबीनची गंजी लावताना घडली घटना

बबलू जाधव

आर्णी ( जि. यवतमाळ) : शेतातील सोयाबीन काढणी केल्यावर गंजी लावत असताना वीज कोसळल्याने युवकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर, तिघे जखमी झाले. ही घटना तालुक्‍यातील आयता (हेटी) येथे सोमवारी (ता.19) दुपारी पाचच्यादरम्यान घडली. तेजस नागोराव मेश्राम (वय 18, रा. आयता (हेटी)) असे मृताचे नाव आहे.

आयता (हेटी) येथे शेतात सोयाबीन कापणी व गंजी लावण्याचे काम दहा जणांची टोळी असणाऱ्या मजुरांनी घेतले होते. तीन दिवसांपूर्वी शेतातील सोयाबीन पीक कापून ठेवले होते. कापणी केलेल्या सोयाबीनला एकत्र गोळा करून गंजी लावण्यासाठी मजूर शेतात गेलेले होते. शेतात काम करीत असताना सोमवारी दुपारी साडेचारच्यादरम्यान विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. 

पावसापासून बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांनी अंगावर ताडपत्री घेतली. एका ताडपत्रीत तेजस मेश्राम, कृष्णा मेश्राम, सूर्यकांत पेंदोर, मनोज मेश्राम हे चौघेही शेतात बसून होते. त्याचवेळी वीज कोसळल्याने तेजस मेश्राम याचा मृत्यू झाला. तर, कृष्णा सीताराम पेंदोर (वय 22), सूर्यकांत दत्ता पेंदोर (वय 23), मनोज बापूराव मेश्राम (वय 40, सर्व रा. आयता हेटी) हे जखमी झाले. 

त्यांना तत्काळ उपचारासाठी सावळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. कृष्णा पेंदोरची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी यवतमाळला हलविण्यात आले. सोमवारी शवविच्छेदन करून तेजसचा मृतदेह नातेवाइकांकडे देण्यात आला. मृताच्या पश्‍चात आईवडील, लहान भाऊ असा आप्तपरिवार आहे. दरम्यान, या घटनेमुळे आयता (हेटी) येथे हळहळ व्यक्त होत आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT