melghat
melghat 
विदर्भ

मेळघाटचे आदिवासी बांधव अशाप्रकारे साजरा करतात होलिकोत्सव, गावाकडे परतण्यास सरुवात

राज इंगळे

अचलपूर (जि. अमरावती) : सातपुडा पर्वतरांगांच्या कुशीत वसलेल्या मेळघाटातील होळीचा उत्सव पपरंपरिक पद्धतीनुसार साजरा होत असतो. सलग पाच दिवस उदरनिर्वाहाच्या कामांना सुटी देवून आदिवासी बांधव होळीच्या रंगात न्हाऊन निघतात. यासाठी रोजगारासाठी बाहेरगावी गेलेले आदिवासी बांधव सध्या होळीच्या सणासाठी परतीच्या मार्गावर दिसून येत आहेत.

आदिवासी बांधवांसाठी होळी सण दिवाळीपेक्षाही मोठा सण मानला जातो. हा सण सलग पाच दिवस साजरा करण्यात येतो. मेळघाटातील होळीच्या पूर्वसंध्येपासून या सणाला खऱ्या अर्थाने सुरवात होते. त्याअगोदर रोजगारासाठी भटकंती करणारा आदिवासी बांधव होळीसाठी मात्र आपल्या गावी परत येत असतो. पहिल्या दिवशी शेतातील पीक व होलिकाचे पूजन केले जाते. एकाच दिवशी सर्व गावात होलिका दहन होत नाही. वेगवेगळ्या दिवशी होळी पेटविल्या जाते. पहिल्या रात्री गावाबाहेरील मोकळ्या जागेवर आदिवासी नृत्य करत असतात.

तालुक्‍यातील बहुतांश गावांमध्ये गावाबाहेर मेघनाथाचा स्तंभ उभारल्या जातो. मेघनाथ आदिवासींचे दैवत आहे. त्याची पूजा केली जाते. मोहफुलांपासून काढण्यात आलेले मद्य सर्वांना सेवन करण्यासाठी दिले जाते. किनकी, ढोलकी व बासरीच्या तालावर आदिवासी रात्रभर तल्लीन होऊन नृत्य करीत असतात. पळसाच्या फुलापासून तयार केलेला नैसर्गिक रंग खेळण्यात येतात. जेवणामध्ये गोड पुरी, गोड भात या पदार्थांचा समावेश असतो. होळीनिमित्त मेळघाटातील कारा, कोठा, काटकुंभ बारू या गावांमध्ये मोठ्या यात्रादेखील भरत असतात. सातपुडा पर्वत रांगातून तापी नदी वाहत आहे. या नदीला आदिवासी बांधव दैवत मानतात. तिची पूजा करतात.

घाटांचा मेळ असणाऱ्या मेळघाटात आदिवासींमध्ये कोरकू, गोंड, राठीया या प्रमुख जाती अधिक प्रमाणात आहेत. आदिवासींच्या सर्वच जाती दरवर्षी पारंपरिकपद्धतीने होळी साजरी करण्यासाठी उत्सुक असतात. त्यामुळे मेळघाटात होळी सणाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT