MP Navneet Rana will go Matoshri after diwalli  
विदर्भ

खासदार नवनीत राणा धडकणार मातोश्रीवर; मुख्यमंत्री पत्राला उत्तर देत नसल्याचा आरोप

सुरेंद्र चापोरकर

अमरावती : शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व एकूणच महाविकास आघाडीचे सरकार गंभीर नसल्याचा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांचे निवेदन घेऊन दिवाळीनंतर मातोश्रीवर धडकणार असल्याचे खासदार नवनीत राणा यांनी आज पत्रपरिषदेत सांगितले.

नवनीत राणा म्हणाल्या, राज्यातील प्रामुख्याने विदर्भातील शेतकरी संकटात असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र मातोश्रीत बसून राज्यकारभार हाकत आहेत. शेतकऱ्यांना मदतीचे केवळ आश्‍वासन देण्यात आले, प्रत्यक्षात मात्र तुटपुंज्या मदतीची घोषणा करण्यात आली. ती सुद्धा कागदोपत्रीच आहे. 

याबाबत आमदार रवी राणा तसेच आपण स्वतः मुख्यमंत्र्यांना यापूर्वी अनेकदा निवेदने दिलीत, दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र आजपर्यंत एकाही पत्राचे उत्तर देण्यात आले नाही तसेच भेटीसाठी वेळ सुद्धा देण्यात आली नाही, असा आरोप त्यांनी पत्रपरिषदेत केला. 

आज शेतकऱ्यांपर्यंत अद्यापही मदत पोहोचलेली नाही. त्यामुळे त्यांची दिवाळी अंधारात आहे. आम्ही तसेच युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते सुद्धा यंदाची दिवाळी साजरी करणार नाही. दिवाळीनंतर म्हणजेच 15 ऑक्‍टोबरला शेतकऱ्यांसह रेल्वेने मुंबईकडे प्रयाण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

मुख्यमंत्र्यांशी चर्चेसाठी वेळ मागण्यात आली असून त्यांनी ती दिल्यास आम्ही निवेदन देऊ, अन्यथा मातोश्रीबाहेर शेतकऱ्यांसोबत आंदोलनाला बसणार असल्याचे नवनीत राणा यांनी सांगितले. पत्रपरिषदेला जितू दुधाने, संजय हिंगासपुरे, ज्योती सैरिसे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्टार प्रवाहसाठी मालिका नव्हे प्रोडक्शन हाउस महत्वाचं; प्राइम टाइमसाठी टॉप ५ मधली मालिका करणार बंद, नेटकरी म्हणतात- आताच तर...

Marbat 2025: सगळं अशुभ,अमंगळ घेऊन जा..गे मारबत! कोण होत्या राणी बाकाबाई भोसले ज्यांच्यामुळे नागपुरात सुरू झाला अनोखा मारबत?

खुशखबर! Oneplus 13 स्मार्टफोनचा दर उतरला; मिळतोय हजारो रुपयांचा डिस्काउंट; 24GB रॅमचा मोबाईल किंमत फक्त...

Asia Cup 2025: श्रेयस अय्यरला टीम इंडियात संधी मिळाली असती, पण कोणाचा 'हट्ट' नडला? इतर संघांपेक्षा वेगळं करण्यासाठी गेले अन्...

कोट्यवधींचा मालक असलेला गोविंदा सुनीतासोबत घटस्फोट झाल्यास किती देणार पोटगी? वेगळं होण्याचं नक्की कारण काय?

SCROLL FOR NEXT